मुंबई ते रायगड.. सुरू आहे सत्तेचा डावपेच!

मुंबई : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि सगळे पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरलेत. ठाकरे गटासाठी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच मुंबई – इथे शिंदे गट सतत गळती लावतेय. कालपरवा संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.


यापूर्वीही अनेक माजी नगरसेवकांनी हात झटकलेत. मुंबईत शिंदे गट ताकद वाढवत असतानाच रायगडमध्ये वेगळीच रणधुमाळी सुरूय. इथे राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आणि त्यांच्या विरोधात ठाकरे, शिंदे, भाजपचे आमदार – सगळेच थेट भिडलेत.



तटकरे कुटुंबीयांचं रायगडवर बरेच वर्ष वर्चस्व राहिलंय. पण आता खुद्द महायुतीतच त्यांच्याविरुद्ध नाराजी आहे. शिंदे गटाचे आमदार आदिती तटकरे पालकमंत्री होऊ नयेत यासाठी चक्क नाराजी व्यक्त करतायत.


यातच शेकापचा पूर्ण पत्ता गायब झालेला दिसतोय. जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय पाहता, शेकापचा गड असलेला रायगड आता पूर्णपणे ढासळलाय. आणि हो या सगळ्या राजकारणात भाजप आपली सत्ता मजबूत करत चाललेय.


तर एकंदरीत मुंबई आणि रायगडमध्ये राजकारण प्रचंड तापलंय. एकीकडे ठाकरे गट गळती थांबवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे शिंदे गट सत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे.


पण या सगळ्या धावपळीत लोकांचे प्रश्न कुठे आहेत? ते अजूनही पाण्यासाठी, रस्त्यांसाठी आणि विकासासाठी वाट बघतायत… आता बघायचं... या राजकारणात पुढचं पाऊल कोण टाकतो, आणि कुणाचा डाव उलटतो! तुम्हाला काय वाटतं, खाली कमेंट करुन नक्की सांगा.

Comments
Add Comment

Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा

अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र; ‘रामजी आके भला करेंगे’ टीझरमध्ये पीक कॉमेडीची झलक

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज मुंबई : भूत बंगला हा २०२६ मधील