मुंबई : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि सगळे पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरलेत. ठाकरे गटासाठी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच मुंबई – इथे शिंदे गट सतत गळती लावतेय. कालपरवा संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला.
यापूर्वीही अनेक माजी नगरसेवकांनी हात झटकलेत. मुंबईत शिंदे गट ताकद वाढवत असतानाच रायगडमध्ये वेगळीच रणधुमाळी सुरूय. इथे राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आणि त्यांच्या विरोधात ठाकरे, शिंदे, भाजपचे आमदार – सगळेच थेट भिडलेत.
तटकरे कुटुंबीयांचं रायगडवर बरेच वर्ष वर्चस्व राहिलंय. पण आता खुद्द महायुतीतच त्यांच्याविरुद्ध नाराजी आहे. शिंदे गटाचे आमदार आदिती तटकरे पालकमंत्री होऊ नयेत यासाठी चक्क नाराजी व्यक्त करतायत.
यातच शेकापचा पूर्ण पत्ता गायब झालेला दिसतोय. जयंत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय पाहता, शेकापचा गड असलेला रायगड आता पूर्णपणे ढासळलाय. आणि हो या सगळ्या राजकारणात भाजप आपली सत्ता मजबूत करत चाललेय.
तर एकंदरीत मुंबई आणि रायगडमध्ये राजकारण प्रचंड तापलंय. एकीकडे ठाकरे गट गळती थांबवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे शिंदे गट सत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे.
पण या सगळ्या धावपळीत लोकांचे प्रश्न कुठे आहेत? ते अजूनही पाण्यासाठी, रस्त्यांसाठी आणि विकासासाठी वाट बघतायत… आता बघायचं… या राजकारणात पुढचं पाऊल कोण टाकतो, आणि कुणाचा डाव उलटतो! तुम्हाला काय वाटतं, खाली कमेंट करुन नक्की सांगा.
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईमधील तापमानात (Mumbai Weather Temperature) सातत्याने वाढ होत असून वाढत्या…
मुंबई : जेईई मेन्स सत्र -२च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. काल (दि १८) जेईई मेन्स सत्र…
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार २० एप्रिल २०२५ रोजी मेगाब्लॉक घेणार…
मुंबई : मुंबईची पहिली जीवनवाहिनी रेल्वे आणि दुसरी जीवनवाहिनी बेस्ट उपक्रमाची बस सेवा आहे. मुंबईत…
मुंबई : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…
मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…