नारळ, आवळा की आणखी काही...तुमच्या केसांसाठी कोणते तेल आहे फायदेशीर

मुंबई: आजकाल निस्तेज आणि कोरड्या केसांच्या समस्येने साऱ्यांनाच ग्रासले आहे. अशातच अनेकजण केस सुरक्षित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे तेल आणि शाम्पूचा वापर करतात. मात्र काही वेळेस चुकीचे तेल लावल्याने केस खराब होतात.


प्रत्येकाचे केस वेगवेगळे असता. यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे तेल सूट होतात. अशातच कोणत्या केसांसाठी कोणते तेल गरजेचे हे समजून घेणे गरजेचे असते.


केसांसाठी योग्य तेल तुमचा स्काल्प आणि केसांच्या क्वालिटीवर अवलंबून असतो. यावरून तुम्हाला समजते की केसांना नारळाचे तेल, आवळ्याचे तेल की इतर कोणत्या प्रकारचे तेल सूट होते.


जर तुमचा स्काल्प तेलकट असेल तर सगळ्यात चांगले बदामाचे तेल असते. दरम्यान, स्काल्पला खाज अथवा जळजळ होत रोझमेरी अथवा लेवेंडरचे तेल योग्य आहे.


याशिवाय तुम्ही केसांना पाण्यात टाकूनही टेस्ट करू शकता. यावरून तुम्ही केसांसाठी योग्य हेअर ऑईल निवडू शकता. ही ट्रिक सोपी आहे.


तुमचे केस स्वच्छ पाण्यात टाका. ५ मिनिटे ठेवा. जर केस तरंगत असतील तर केसांची पोरसिटी लो आहे. यासाठी तुम्हाला ग्रेपसीड ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, आर्गन ऑईल ही तेल फायदेशीर आहे.


जर केस पाण्यात बुडाले तर केसांची पोरसिटी हाय आहे. अशातच ऑलिव्ह ऑईल, नारळाटे तेल यांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. जर केस पाण्याच्या मधोमध राहिले तर पोरसिटी मिडियम आहे. यासाठी बदामाचे तेल फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि

प्रशासनात खांदेपालट, ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात खांदेपालट करत चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. विविध

मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी म्हाडाकडून मुंबईत १२० घरांची विक्री; या तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार सुरु

मुंबई : मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व

राष्ट्रवादीच्या मुंबई पदाधिकाऱ्यांकडून 'दादांच्या' अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन...

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता

BMC Election 2026: भाजप - शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार

मुंबई: आज म्हणजेच सोमवार २ फेब्रुवारी रोजी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुंबई