अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी आणा काही गोष्टी, होईल कृपा लक्ष्मी मातेची

मुंबई: यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीयेचा सण ३० एप्रिलला साजरा केला जात आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे सगळी शुभ कार्ये या दिवशी केली जातात. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणेही शुभ मानले जाते. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी केल्यास लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते.


मात्र अनेकदा सोने-चांदीसारख्या महागड्या गोष्टी या दिवशी खरेदी करणे सगळ्यांनाच जमत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या घरी आणल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील.



मातीची भांडी


या दिवशी मातीचे भांडे जसे की पाणी पिण्याचा घडा विकत घेतल्याने तसेच दान करणे शुभ असते.



जव अथवा गहू


जव आणि गहू हे अन्नपूर्णा देवीचे प्रतीक आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जव अथवा गहू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात भरभराट होते.



तांदूळ


या दिवशी तुम्ही थोडेसे तांदूळ खरेदी करून ते पुजेमध्ये अर्पित करून त्यानंतर गरिबांना दान करू शकता. यामुळे घरात सुखसमृ्द्धी येते.



पूजेचे साहित्य


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धूप, दीप, अगरबत्ती, चंदन तसेच इतर पुजेचे साहित्य करणे अतिशय शुभ मानले जाते.



पुस्तके आणि ज्ञानोपयोगी गोष्टी


ज्ञान हे अक्षय्य मानले जाते. यामुळे या दिवशी धार्मिक अथवा ज्ञानवर्धक पुस्तके खरेदी करणे अथवा वाचणे शुभ मानले जाते.



तुळशीचे रोप


तुळशीच्या रोपाचे हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. या दिवशी तुळशीत रोप लावल्याने अथवा त्याची सेवा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.



श्रद्धेनुसार दान


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी गरिबांना, गरजूंना अन्न, वस्त्र अथवा धान्याचे दान केले तर ते पुण्यदायी ठरते.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे