अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी आणा काही गोष्टी, होईल कृपा लक्ष्मी मातेची

  74

मुंबई: यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीयेचा सण ३० एप्रिलला साजरा केला जात आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे सगळी शुभ कार्ये या दिवशी केली जातात. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणेही शुभ मानले जाते. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी केल्यास लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते.


मात्र अनेकदा सोने-चांदीसारख्या महागड्या गोष्टी या दिवशी खरेदी करणे सगळ्यांनाच जमत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या घरी आणल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील.



मातीची भांडी


या दिवशी मातीचे भांडे जसे की पाणी पिण्याचा घडा विकत घेतल्याने तसेच दान करणे शुभ असते.



जव अथवा गहू


जव आणि गहू हे अन्नपूर्णा देवीचे प्रतीक आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जव अथवा गहू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात भरभराट होते.



तांदूळ


या दिवशी तुम्ही थोडेसे तांदूळ खरेदी करून ते पुजेमध्ये अर्पित करून त्यानंतर गरिबांना दान करू शकता. यामुळे घरात सुखसमृ्द्धी येते.



पूजेचे साहित्य


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धूप, दीप, अगरबत्ती, चंदन तसेच इतर पुजेचे साहित्य करणे अतिशय शुभ मानले जाते.



पुस्तके आणि ज्ञानोपयोगी गोष्टी


ज्ञान हे अक्षय्य मानले जाते. यामुळे या दिवशी धार्मिक अथवा ज्ञानवर्धक पुस्तके खरेदी करणे अथवा वाचणे शुभ मानले जाते.



तुळशीचे रोप


तुळशीच्या रोपाचे हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. या दिवशी तुळशीत रोप लावल्याने अथवा त्याची सेवा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.



श्रद्धेनुसार दान


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी गरिबांना, गरजूंना अन्न, वस्त्र अथवा धान्याचे दान केले तर ते पुण्यदायी ठरते.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना