Mumbai : मुंबईत कार अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ मारुती इको कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) यांचा मृत्यू झाला. अपघातात गीता राजभर, खुशबू राजभर, सुलेखा वैद्य आणि चेतन नंदू पाटील हे चौघे जखमी झाले.



मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात राहणारे दक्षिण मुंबईत मासे खरेदीसाठी जात होते. ही मंडळी मुंबईत मासे खरेदी करुन त्यांची ठाण्यात विक्री करत होते. व्यवसायाकरिता ते नियमित ठाणे ते दक्षिण मुंबई असा प्रवास करत होते. नेहमीप्रमाणे या वेळीही सर्व जण मासे खरेदीसाठी कारने निघाले होते. कार चेतन नंदू पाटील चालवत होता. त्याने रस्ता मोकळा बघून कारचा वेग वाढवला. वेग खूपच जास्त वाटल्यामुळे कारमध्ये बसलेल्या सर्वांनीच चेतनला जरा हळू चालव असे सांगून बघितले. पण चेतनने कारचा वेग कमी केला नाही. भरधाव वेगाने जात असताना नियंत्रण सुटले आणि ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ मारुती इको कार दुभाजकाला धडकली. कार जोरात धडकल्यामुळे झालेल्या अपघातात रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) गंभीर जखमी झाले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
Comments
Add Comment

Transport Minister Pratap Sarnaik's announcement : ठाणेकरांची हक्काची मेट्रो तीन महिन्यांत रुळावर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घोडबंदर रोडचे पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण मुंबई

Devendra Fadanvis : इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव मुंबई : ज्या

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थीला यश, बंजारा टायगर आंदोलन मागे; मागण्यांवर सकारात्मक भूमिका

मुंबई : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू

Mumbai Metropolitan Region : मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीजपुरवठा अधिक सक्षम

महापारेषणची बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

Eknath Shinde Opretion Tiger : 'उबाठा'च्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?

'ऑपरेशन टायगर'ला पुन्हा वेग; ९ पैकी ८ खासदार हजर असल्याची चर्चा मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'उबाठा'

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात