शेणाने सारवून गारवा? दिल्लीत प्राचार्यांचा प्रयोग फसला! नक्की काय झालं?

  84

नवी दिल्ली : दिल्लीत उष्णतेने होरपळलेल्या विद्यापीठाच्या वर्गखोल्यांमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एक अनोखा आणि पारंपरिक प्रयोग केला. त्यांनी स्वतः आपल्या हातांनी वर्गाच्या भिंतींवर गायीचे शेण लावले. हा भारतीय पारंपरिक पद्धतीवर आधारित उपाय असून तो घरात थंडावा निर्माण करतो, असा संदेश त्यांनी व्हॉट्सअप मेसेजमध्ये वाचला होता. त्याची अमलबजावणी त्यांनी केली. त्याचा विडिओ चांगलाच व्हायरल झाला.


?si=49cXLRGwrckbwhmq

मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आधुनिक काँक्रीट आणि सिमेंटच्या इमारतींमध्ये अशा उपायांना फारसा उपयोग नाही. मातीच्या भिंती असतील तर ठीक आहे. गायीच्या शेणामध्ये थंडावा निर्माण करण्याची क्षमता मर्यादित असते. परंतु काँक्रीट आणि सिमेंटच्या इमारतींमध्ये तो पंखा किंवा कूलरचा पर्याय होऊ शकत नाही. विशेषतः लक्ष्मीबाई कॉलेजमधील ज्या जुन्या इमारतींमध्ये वर्ग आहेत, तिथे हवेशीरपणा कमी आहे, वर्ग मोठे आहेत आणि पंखेही अपुरे आहेत. अशा ठिकाणी गायीच्या शेणाचे लेप कामाचे नाही, असे तज्ज्ञ सांगतात.



या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी स्पष्टपणे सांगितले की खरी समस्या म्हणजे इमारतींच्या दुरवस्थेकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले गेले आहे. अनेक वर्ग अतिप्रवेशित आहेत, क्रॉस व्हेंटिलेशन नाही, आणि कार्यरत पंख्यांची संख्याही खूपच कमी आहे. कूलर किंवा एसी तर दूरच. शौचालयांची अवस्था देखील अत्यंत खराब आहे.


दरम्यान, हे आमच्या संशोधन प्रस्तावाचा भाग आहे, असे प्राचार्यांनी सांगितले. पण विद्यार्थ्यांच्या मते, यामुळे काहीही फरक पडलेला नाही. एका विद्यार्थ्याने म्हटले, “काही वर्ग खरेच खूप गरम आहेत, पण कोणी गायीच्या शेणाची मागणी केली नव्हती. आम्हाला फक्त नीट चालणारे पंखे किंवा कमीत कमी कूलर हवेत.


या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये प्राचार्य वत्सला आणि काही कर्मचारी भिंतींवर गायीचे शेण फासून सारवताना दिसतात. हे ब्लॉक सी मध्ये करण्यात आले आहे, जे कॉलेजमधील सर्वात जुने आणि उन्हाळ्यात सर्वाधिक उष्णता जाणवते, अशी ही बिल्डिंग आहे.


कॉलेजमध्ये नुकतेच कुलगुरू योगेश सिंग यांच्या हस्ते नवीन ब्लॉकची पायाभरणी करण्यात आली. पण जुन्या इमारतींची अवस्था मात्र जसेच्या तशी राहिली आहे. हेच दुहेरी धोरण विद्यार्थ्यांच्या नाराजीचे मूळ कारण ठरत आहे.


गायीच्या शेणाने गारवा मिळवण्याच्या या प्रयत्नामुळे टिकावू, पर्यावरणपूरकता आणि नवकल्पनांबाबत चर्चा रंगली असली, तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा तात्पुरत्या कृतींपेक्षा खऱ्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. गायीचे शेण नव्हे, तर पंखे आणि कूलरच खरी गरज भागवू शकतात!

Comments
Add Comment

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक