Mumbai : मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार, डी कंपनीकडून मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन

मुंबई : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहेत, असे पुढे ही व्यक्ती म्हणाली. फोन येताच मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्याचा नंबर आणि लोकेशन शोधले. यानंतर संबंधित व्यक्तीला बोरिवलीतून पकडण्यात आले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई तातडीने केली.



धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सूरज जाधव असे आहे. तो बोरिवलीचा रहिवासी आहे. याआधीही त्याने बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना केला होता. त्यावेळीही त्याला अटक झाली होती. याआधी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला घरात घुसून ठार करू, त्याची कार बॉम्बस्फोट करुन उडवून देऊ असा धमकीचा संदेश आला होता. काही दिवसांपूर्वी अमूक विमानात बॉम्ब ठेवला आहे, अशा स्वरुपाच्या धमक्या वाढल्या होत्या. आता हा नवा मुंबई बॉम्बस्फोटाने उडवून देऊ असा धमकी देणारा फोन आला.



विनाकारण भीती निर्माण करण्यासाठी तसेच धमकावून संभ्रम निर्माण करण्यासाठी फोन किंवा संदेश पाठवण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भीती निर्माण करण्यासाठी तसेच धमकावून संभ्रम निर्माण करण्यासाठी फोन किंवा संदेश पाठवणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई होणार आहे.
Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत