Thane News : इंग्रजी शाळेत फक्त इंग्रजीतच बोला सांगणाऱ्या शाळांना मनसे स्टाईल उत्तर

  69

ठाणे : महाराष्ट्रात मराठीच्या गळचेपीच्या घटनांची मालिका काही थांबेना. ठाण्यातील इंग्रजी शाळांमध्ये मराठी बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात मराठीऐवजी इंग्रजी बोलण्याचा दबाव आणला होता. या शाळेला मनसेने मनसे स्टाईलने उत्तर देत दणका दिला आहे.



सध्या मराठी भाषेचा वाद महाराष्ट्रात मिटल्या मिटत नाही आहे. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांमध्ये मराठी भाषेची गळचेपी होतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेच्या आवारात मराठी बोलण्यावर बंदी घातली होती. तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी बोलल्याबद्दल अपमानित केले जात असल्याची राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेकडे याबाबत तक्रार केली होती. मंगळवारी (दि १५ ) शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा परिषदेने दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली.


परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शाळांनी मराठी भाषेचा वापर आणि आदर राखणे जरुरीच आहे. जर कोणत्याही शाळेने फक्त इंग्रजी बोलण्याचे धोरण राबवले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल. तसेच मराठी भाषेचा वापर केवळ भाषेच्या तासातच करू नये. त्याऐवजी, ते दैनंदिन संभाषणांमध्ये, वर्गातील चर्चांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, नाटकांमध्ये आणि भाषण स्पर्धांमध्ये वापरले गेले पाहिजे. शिक्षण विभागाच्या या आदेशाचे मनसेने स्वागत केले आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या भाषिक असमतोलाला रोखण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल असल्याचे म्हटले. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचं मनसेकडून कौतुक करण्यात आले.

Comments
Add Comment

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

अलिबाग-वडखळ महामार्गावर खड्डेच खड्डे; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अलिबाग : अतिवृष्टीमुळे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गावर केलेली तात्पुरती मलमपट्टी उखडून गेल्याने या

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या