Thane News : इंग्रजी शाळेत फक्त इंग्रजीतच बोला सांगणाऱ्या शाळांना मनसे स्टाईल उत्तर

  63

ठाणे : महाराष्ट्रात मराठीच्या गळचेपीच्या घटनांची मालिका काही थांबेना. ठाण्यातील इंग्रजी शाळांमध्ये मराठी बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात मराठीऐवजी इंग्रजी बोलण्याचा दबाव आणला होता. या शाळेला मनसेने मनसे स्टाईलने उत्तर देत दणका दिला आहे.



सध्या मराठी भाषेचा वाद महाराष्ट्रात मिटल्या मिटत नाही आहे. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांमध्ये मराठी भाषेची गळचेपी होतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेच्या आवारात मराठी बोलण्यावर बंदी घातली होती. तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी बोलल्याबद्दल अपमानित केले जात असल्याची राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेकडे याबाबत तक्रार केली होती. मंगळवारी (दि १५ ) शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा परिषदेने दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली.


परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शाळांनी मराठी भाषेचा वापर आणि आदर राखणे जरुरीच आहे. जर कोणत्याही शाळेने फक्त इंग्रजी बोलण्याचे धोरण राबवले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल. तसेच मराठी भाषेचा वापर केवळ भाषेच्या तासातच करू नये. त्याऐवजी, ते दैनंदिन संभाषणांमध्ये, वर्गातील चर्चांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, नाटकांमध्ये आणि भाषण स्पर्धांमध्ये वापरले गेले पाहिजे. शिक्षण विभागाच्या या आदेशाचे मनसेने स्वागत केले आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या भाषिक असमतोलाला रोखण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल असल्याचे म्हटले. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचं मनसेकडून कौतुक करण्यात आले.

Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि व्याख्याते दाजी पणशीकर यांचे शुक्रवार, ६ जून रोजी संध्याकाळी ठाण्यातील राहत्या

घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल

मेट्रो प्रकल्पाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम हाती ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

आणखी एका गर्दीने घेतले नाहक जीव! मरण खरंच स्वस्त झालंय का?

मुंबई : आपल्या देशात कोणत्याही सण, उत्सव, सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी आणि त्यात जाणारे बळी हे नेहमीचंच झालंय.

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.