ठाणे : महाराष्ट्रात मराठीच्या गळचेपीच्या घटनांची मालिका काही थांबेना. ठाण्यातील इंग्रजी शाळांमध्ये मराठी बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात मराठीऐवजी इंग्रजी बोलण्याचा दबाव आणला होता. या शाळेला मनसेने मनसे स्टाईलने उत्तर देत दणका दिला आहे.
सध्या मराठी भाषेचा वाद महाराष्ट्रात मिटल्या मिटत नाही आहे. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटनांमध्ये मराठी भाषेची गळचेपी होतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात, शाळेच्या आवारात मराठी बोलण्यावर बंदी घातली होती. तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी बोलल्याबद्दल अपमानित केले जात असल्याची राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेकडे याबाबत तक्रार केली होती. मंगळवारी (दि १५ ) शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा परिषदेने दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली.
परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शाळांनी मराठी भाषेचा वापर आणि आदर राखणे जरुरीच आहे. जर कोणत्याही शाळेने फक्त इंग्रजी बोलण्याचे धोरण राबवले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल. तसेच मराठी भाषेचा वापर केवळ भाषेच्या तासातच करू नये. त्याऐवजी, ते दैनंदिन संभाषणांमध्ये, वर्गातील चर्चांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, नाटकांमध्ये आणि भाषण स्पर्धांमध्ये वापरले गेले पाहिजे. शिक्षण विभागाच्या या आदेशाचे मनसेने स्वागत केले आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या भाषिक असमतोलाला रोखण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल असल्याचे म्हटले. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचं मनसेकडून कौतुक करण्यात आले.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…