वांद्रे-वर्सोवा पुलाला स्थानिकांचा विरोध

  53

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई सागरी किनारा मार्गावरील वांद्रे-वर्सोवा पुलाला तीव्र विरोध दर्शवत जुहू येथील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणपूरक समुद्राखालील बोगद्याचा पर्याय सुचवला आहे. ‘जुहू बीच वाचवा’ मोहिमेअंतर्गत आज मुंबईत पत्रकार परिषदेत उम्मेद नाहाटा, डॉ. हिमांशू मेहता, श्रीमती उषाबेन पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


डॉ. हिमांशू मेहता यांनी यावेळी सांगितले, “हा प्रकल्प जुहू चौपाटीच्या नैसर्गिक सौंदर्याला हानी पोहोचवेल आणि पर्यावरणीय समतोल ढासळेल. दररोज लाखो पर्यटक या बीचला भेट देतात. त्यामुळे समुद्र पुलाऐवजी ऐवजी समुद्राखालील बोगदा हा अधिक योग्य आणि शाश्वत पर्याय आहे.”या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी न्यायालयाने अधिक कागदपत्रांची मागणी केली होती, जी पूर्ण करून आता नव्याने याचिका सादर करण्यात आली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी सोशल मीडियावर जनजागृती, शांततामय रॅली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.


चळवळीच्या माध्यमातून जुहू चौपाटीचे सौंदर्य, पर्यावरणीय समतोल आणि दीर्घकालीन शाश्वतता यांचे रक्षण करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व भारतीय नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले, जेणेकरून मुंबईच्या किनारपट्टीचे वैभव आणि पर्यावरण अबाधित राहील. जुहू बीचच्या नैसर्गिक सौंदर्याचे संरक्षण पर्यावरणीय समतोल राखण्याची गरज समुद्राखालील बोगदा हा शाश्वत पर्यायस्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या हितांचे रक्षण‘जुहू बीच वाचवा’ मोहीम पुढील काळातही विविध उपक्रमांद्वारे आपला आवाज बुलंद करत राहणार आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा