मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता

Share

मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान आहे, मात्र यासोबतच आर्द्रतेतही वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या मुंबईत उकाडा,उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे.

आता पुढील तीन–चार दिवस आर्द्रतेचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवेल आणि विशेषतः सकाळी व संध्याकाळी अधिक घाम येण्याची शक्यता आहे. सामान्यतः एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा चढतोच, मात्र यंदा आर्द्रतेत होणारी वाढ ही मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, मुंबईच्या तापमानाचा पाराही पुढील काही दिवस चढाच राहणार आहे.

यामुळे मुंबईकरांना उन्हाचा तडाखाही सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या तापमानात सोमवारपासून वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ही वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवेची द्रोणीय स्थिती तयार होत आहे. यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. तापमानातील ही वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उकाडा आणि उन्हाचा ताप यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मे महिन्यात मुंबईतील स्थिती काय असेल ही चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे. समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाचा त्रास मुंबईकरांना अधिक होत आहे.

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

7 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

9 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

9 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

9 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

9 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

10 hours ago