DC vs RR, IPL 2025: फलंदाजीला अनुकूल मैदानावर विजय कोणाचा?

  39

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे त्यामुळे दोन्ही संघाना जास्त धावा करण्याची संधी आहे. दिल्लीने आता पर्यंत या मैदानावर मुंबई विरुद्धचा सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्लीचे पारडे नक्कीच राजस्थान रॉयल्स समोर जड आहे.


दिल्लीची फलंदाजी पाहता दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणे सहज शक्य आहे. दिल्लीला जोफ्रा आर्चरचा सुरवातीच्या स्पेल पासून सावध राहावे लागले. जोफ्रा आर्चर सुरवातीला इनस्विंगर मारतो त्यामुळे चेंडू झटकन आत घुसतो व त्रिफळा उडतो. गेल्या सामन्यातील पराजयामुळे दिल्लीला हा सामना संयमाने खेळावा लागेल, चुका कमी कराव्या लागतील. राजस्थानसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. लागोपाठ दोन सामने गमावल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचले आहे. अशावेळी आक्रमकपणे उत्तर देणे गरजेचे आहे. संजू सॅमसंगला कर्णधारपदाची भुमिका बजवावी लागेल तर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग ह्यांना आज मोठ्या धावसंखेचे उद्दिष्ट साध्य करावे लागेल.


गोलंदाजीमध्ये दोन्ही संघ एकमेकाला पूरक आहेत, तरीही फिरकीमध्ये दिल्लीचा संघ राजस्थान पेक्षा दोन पाऊले पुढेच आहे. कुलदीप आणि विपराज ह्या दोंघाची फिरकी दिल्लीच्या मैदानावर खेळून काढणे कठीणच आहे.
चला तर बघूया दिल्ली राजस्थानला रोखू शकते का?

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी