DC vs RR, IPL 2025: सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय

यमुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला. या सुपरओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रोमहर्षक विजय मिळवला आहे.


दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८८ धावा केल्या होत्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनेही १८८ धावाच केल्या. त्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. 


सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी केली. त्याने एका षटकांत ११ धावा केल्या. यात त्यांनी दिल्लीला विजयासाठी १२ धावांचे आव्हान दिले. दिल्लीकडून लोकेश राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स फलंदाजीसाठी आले. दिल्लीने सुपर ओव्हरमधील पहिल्या बॉलवर २ धावा. त्यानंतर चौकार, त्यानंतर १ धाव आणि चौथ्या बॉलवर षटकार ठोकत सहज विजय मिळवला.


याआधी दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. यशस्वी जायसवाल आणि संजू सॅमसन यांनी चांगली सुरूवात करून दिली. मात्र ३१ धावांवर संजू सॅमसनला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. सलामीवीर यशस्वी जायसवालने ५१ धावांची खेळी केली. त्याने ३७ बॉलमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ही खेळी साकारली. रियान पराग केवळ ८ धावांवर बाद झाला. मात्र नितीश राणाने जबरदस्त खेळी करताना ५१ धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार ठोकले.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीत उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात चांगली झाली नाही. तिसऱ्याच षटकांत जोफ्रा आर्चरने मॅकगर्कला पॅव्हेलियनला धाडले. त्याने केवळ ९ धावा केल्या. त्यानंतर लगेचच पुढच्याच ओव्हरमध्ये करूण नायर बाद झाला. त्याला खातेही खोलता आले नाही. दरम्यान, यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेलने दिल्लील सांभाळले आणि एक चांगली भागीदारी केली. मात्र १३व्या षटकांत राहुलची विकेट पडली. राहुलने ३८ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक पोरेलही बाद झाला. यानंतर १७व्या षटकांत अक्षर पटेलही बाद झाला. त्याने ३४ धावा केल्या.


Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने