प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल - मोटेल थांबे रद्द करा, प्रताप सरनाईक यांचे आदेश

  45

मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री . प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.


लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा -नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत.


या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देशित त्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

प्रहार आरबीआय रेपो दर विश्लेषण: रेपो दर घटला पण अर्थव्यवस्थेचे काय ? वाचा अर्थतज्ज्ञांची मते.....

प्रतिनिधी: आज रेपो दरात घट झाल्यानंतर बाजाराने उत्सव साजरा केला. विशेषतः रेपो दरात ०.५० टक्के अनपेक्षित कपात

Stock Market: रेपो दर कपातीचे बाजाराकडून 'बुल' स्वागत सेन्सेक्सची ८४५ तर निफ्टीची २७४ अंकाने उसळी !

प्रतिनिधी: आरबीआयच्या रेपो दरात कपात करण्याचा निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराने जोरात सुरू केले आहे. आरबीआयच्या २५

मोठी बातमी RBI News: रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात सर्वसामान्यांचे कर्जाचे होणार स्वस्त,११ महिने पुरेल इतके विदेशी चलनसाठा

प्रतिनिधी: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५० टक्क्यांनी कपात

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचे कामगार मंत्र्यांना साकडे

मुंबई : विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे सविस्तर निवेदन महाराष्ट्र

मध्य रेल्वेच्या 'गो ग्रीन' उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई :मध्य रेल्वेने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी दृढ

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश मुंबई:आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या