रोहे (धाटाव) : रोहेजवळील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सुमारे ९०० मीटर लांबीच्या गोदामाला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामातील मोठ्या प्रमाणावरील साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि दीपक नायट्रेट कंपनीची गाडी घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आली.
सुरक्षाविषयक बाबतीत कंपनीने गंभीर दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. गोदामात फायर अलार्म, स्प्रिंकलर, हायड्रंट यंत्रणा कार्यरत नव्हत्या. कर्मचारीवर्गालाही योग्य प्रशिक्षण नव्हते. आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणतीही तयारी नसल्याने ही आग नियंत्रणात आणताना मोठा वेळ वाया गेला.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक माहितीनुसार, इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट हे संभाव्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, इतक्या मोठ्या गोदामात कोणतीही प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना न ठेवता व्यवसाय चालवल्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणावर सवाल उपस्थित होत आहेत.
या आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम झाल्याची शक्यता आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही तात्काळ कारवाई किंवा घटनास्थळी तपासणी करण्यात आलेली नाही. औद्योगिक क्षेत्रात जबाबदारीने काम करावे लागणाऱ्या मंडळाचे हे मौन जनतेच्या आरोग्याशी खेळणारे ठरत आहे.
या घटनेनंतर औद्योगिक कंपन्यांच्या निष्काळजी कारभाराचा आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या शासकीय यंत्रणांचा बुरखा फाटल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांकडून कंपनी प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळावर कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी औद्योगिक सुरक्षेविषयी प्रशासन आणि कंपन्यांनी जागरूक होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या दुर्घटना टळणार नाहीत.
यमुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील ३२व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरपर्यंत…
मुंबई : येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.…
मुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांना भावनिक साद अमरावती : विदर्भातील अमरावती येथे विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर विदर्भातील प्रकल्पग्रस्त…
मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन…
मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर…
मुंबई : आगामी काळात रायगड जिल्ह्यात भाजपा शतप्रतिशत होणार असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र…