Warm Water: कोमट पाणी प्यायल्यामुळे 'हे' फायदे होतील!

उन्हातून आल्यावर सगळ्यांनाच थंड पाणी पिण्याची सवय असते. पण तेच थंड पाणी तुमच्या शरीराला योग्य नाही. हल्ली रोगाचं प्रमाण दिवसेंदिवस खुप वाढत आहे. तरीही लोक आरोग्याला एवढ्या गंभीरतेने पाहत नाहीत. आपल्याला जेवढी थंड पाण्याची गरज असते तेवढीच आपल्या शरीराला कोमट पाण्याची देखील गरज असते. थंड पाणी हे प्रमाणपेक्षा जास्त प्यायल्याने त्रास होऊ शकतो.



उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी प्यावे का?


सगळ्यांनाच थंड पाणी पिण्याची सवय असते. उन्हातून आलं कि सगळ्यांना थंड पाणी प्यावेसे वाटते. पण हे थंड पाणी जर प्रमाणपेक्षा जास्त प्यायलो तर शरीराला त्रास होऊ शकतो. त्याऐवजी उन्हातून आल्यावर साधारण पाणी प्यायलो तर त्रास होत नाही.



कोमट पाणी का प्यायला पाहिजे?


काही लोकांना कोमट पाणी पिण्याची सवय असते. सकाळी उपाशी पोटी जर कोमट पाणी प्यायलो तर ते खुप फायदेशीर असते. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यायलो तर ते आरोग्याला फायदेशीर ठरू शकते
.
आतड्यांच्या आरोग्यासाठी देखील कोमट पाणी फायदेशीर असते. तुम्ही पोट रिकामे असताना कोमट पाणी प्यायल्यास तुमचा तणाव आणि चिंता कमी होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्याने सूज कमी करणे, पेशींना आराम मिळणे, रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारणे असे फायदे होऊ शकतात. कोमट पाणी हे डोकेदुखी आणि मायग्रेन यासारख्या आजारांवर मात करण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण