रायगडमध्ये गेल्या तीन वर्षांत १०३ जणांचे खून!

९५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश


अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये १०३ जणांचा वेगवेगळ्या कारणावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. पैकी ९५ गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.


रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित येणाऱ्या १३ तालुक्यांपैकी १२ तालुक्यात खुनाचे गुन्हे घडले असून, त्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर व रोहा या तालुक्यांमध्ये घडले आहेत.



रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २८ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यामार्फत जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातो. गुन्हे घडू नये, यासाठी पोलिसांमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृतीही केली जाते. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील पोलिसांकडून केली जाते. पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, जिल्ह्यात संशयावरून व अन्य कारणावरून खून करणाऱ्यांचा आकडादेखील वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.


रायगड जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रलंबित गुन्ह्यांबाबत कायमची फाईल बंद केली जात नाही. संबंधित आरोपींचा शोध सुरुच असतो. त्यांची माहिती घेण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमातून सुरु असते. -सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

Comments
Add Comment

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

पेटीएम ट्रॅव्हलचा ‘महा कार्निव्हल सेल’

विमान आणि बस प्रवासावर २० % पर्यंत सणासुदीची सवलत मुंबई:पेटीएमने ‘महा कार्निव्हल सेल’ची घोषणा केली आहे. या

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात