रायगडमध्ये गेल्या तीन वर्षांत १०३ जणांचे खून!

९५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश


अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये १०३ जणांचा वेगवेगळ्या कारणावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. पैकी ९५ गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.


रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित येणाऱ्या १३ तालुक्यांपैकी १२ तालुक्यात खुनाचे गुन्हे घडले असून, त्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर व रोहा या तालुक्यांमध्ये घडले आहेत.



रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २८ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यामार्फत जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातो. गुन्हे घडू नये, यासाठी पोलिसांमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृतीही केली जाते. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील पोलिसांकडून केली जाते. पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, जिल्ह्यात संशयावरून व अन्य कारणावरून खून करणाऱ्यांचा आकडादेखील वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.


रायगड जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रलंबित गुन्ह्यांबाबत कायमची फाईल बंद केली जात नाही. संबंधित आरोपींचा शोध सुरुच असतो. त्यांची माहिती घेण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमातून सुरु असते. -सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

Comments
Add Comment

Dhurandhar 2 : 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य धरचा संताप, नेटकऱ्यांना दिला कारवाईचा इशारा

रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. या सिनेमाचे अनेक सिन सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत

Dhurandhar 2 : धुरंधरची रेकॉब्रेक कमाई सुरुच, आठवड्यातच १००० कोटींचा टप्पा पार

मुंबई : रणवीरच्या धुरंधर २ सिनेमानं रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून जगभरात सर्वांना वेड लावलं आहे. आदित्य धर

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

Ram Navami 2026 : प्रभू श्रीरांमांचे 'हे' आदर्श आजही ठरतात प्रेरणादायी

हिंदू धर्मात चैत्र शुद्ध नवमी अर्थात 'राम नवमी' या दिवसाला फार महत्त्व आहे. यंदा २६ मार्च २०२६ रोजी सर्वत्र मोठ्या

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा