मुंबईतील मिठी नदी, नाले ५० दिवसांत गाळमुक्त होणार

कामात त्रिसूत्री वापरण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदी आणि नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी पुढील ५० दिवसांचे नाला तसेच दिवसानिहाय नियोजन करावे, अधिकाऱ्यांनी सतत आपल्या परिसरातील नाल्यांना भेट देऊन कामांचा आढावा घ्यावा. त्याचबरोबर पावसाळ्यातही विविध प्राधिकरणांशी संपर्कात राहावे, अशा सूचना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, २५ मार्चपासून नालेसफाई सुरू झाली असून, आतापर्यंत १२ टक्के गाळ काढण्यात आला आहे.


मुंबईत पावसाळापूर्व कामे सध्या वेगाने सुरू आहेत. मिठी नदीसह शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक पार पडली. प्रत्येक अभियंत्याच्या भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची इत्यंभूत माहिती त्यांना असायलाच हवी, असे आयुक्तांनी नमूद केले.


कामाची सद्यस्थिती, तेथील आकाने, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आदींबाबत आतापासूनच नियोजन करून त्यावर आताच तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दरम्यान, या कामात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवा. प्रत्येक अभियंत्याने कामांचा टप्पा, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि हातातील कालावधी त्याचबरोबर पंप पुरवणाऱ्या कंत्राटदारांवर देखील कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला. तसेच त्रिसूत्रीचा वापर करून पुढील कामांचे नियोजन करावे, अशा सूचना पालिका आयुक्तांनी मा बैठकीअंतर्गत दिल्या.



'मोबाइल पंप सज्ज ठेवा'


सखल भागामध्ये पाणी उपशासाठी पालिका पंप बसविणार आहे. हे पंप पावसाळ्यात बंद पडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक पंपासाठी सूक्ष्म नियोजन करून तेथे पालिकेचा कर्मचारी तैनात कराया, काही मोबाइल पंग सज्ज ठेवावेत. एखाद्या ठिकाणच्या पंपामध्ये ऐनवेळी बिघाड झाल्यास तेथे नोबाइल पंपाद्वारे पाणी उपसा करावा, पंपामध्ये सातत्याने विघाड झाला, तर इहन्मुंबई महानगरपालिका पंप पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. यंदाच्या पावसाळ्यात जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, हवामान विभागातर्फे जेव्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात येईल, अशावेळी प्रत्येक अधिकाऱ्याने कार्यस्थळी हजर राहावे, असेही आयुक्तांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५