Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील २ दिवस अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुरूच आहे. दुसरीकडे, अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण देखील निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पुढील एक ते दोन दिवसांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, अकोला येथे ४२.४ सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. तर, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी (दि.१३) गारासह अवकाळी पाऊस झाला.


पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र संपले आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडून विदर्भाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यामुळे काही भागांत पावसाचा अंदाज आहे.पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत पावसाचा अंदाज आहे.



सोमवार (दि.१४) नंतर लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये जोरदार पाऊस पडेल. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. कोकण, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


गेले दोन दिवस राज्यात झालेल्या हवामान बदलाचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसला असून जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडाली. रविवारी (दि. १३) येवला, निफाड आणि चांदवड तालुक्यांतील काही गावांना गारपिटीचा फटका बसला.तर जळगाव, पिंपरी चिंचवड आणि नांदेडमध्ये अर्धा तास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. महाराष्ट्रात हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आधीच वर्तवला होता.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य