एसटी बसेसमध्ये लागणार जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटन

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात परिवहन मंडळाने महत्तवाचा निर्णय घेतला आहे.स्वारगेट घटनेनंतर एसटीकडून सध्याच्या १२ हजार बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जिपीएस बसवण्यात येणार आहे.याशिवाय एसटी महामंडळाने नव्या अडीच हजार गाड्यांमध्ये जीपीएस, पॅनिक बटण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे


एसटी महामंडळाकडे सध्या उपलब्ध असलेल्या १५ हजार बसेसपैकी ३००० बस पुढील वर्षभरात स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. सुस्थितीतील असलेल्या १२ हजार बस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार आहे आहेत. या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या बसेसमध्ये दोन महिन्यांत प्रत्येकी ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. तसेच त्याचे मॉनिटरिंग गाडीतच असणार आहे. महामंडळाच्या सर्व बसेसना जीपीएस प्रणाली देखील बसवली जाणार आहे. त्यामुळे बसेसचे नेमके लोकेशन समजायला मदत होणार आहे.


यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून देखील निधी मागण्यात आला असून मे महिन्यात निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन केले जात आहे. एसटी महामंडळाने याआधी कोट्यवधी रुपये खर्च करून १४ हजार बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली होती.मात्र त्यातील ६००० गाड्यांमधील यंत्रणा निकामी झाली आहे. पडताळणी केल्यानंतर फक्त ८००० बसेसमधील जीपीएस यंत्रणा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता ६००० बसगाड्यांमध्ये पुन्हा नव्याने जीपीएस मशिन बसवावे लागणार आहेत

Comments
Add Comment

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी