Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्याने विशालने कारागृहात केली आत्महत्या

कल्याण : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागात २३ डिसेंबर २०२४ रोजी खाऊ आणायला गेलेल्या १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात आत्महत्या केली. तळोजा कारागृहाच्या शौचालयात जाऊन त्याने पहाटे चार ते पाच दरम्यान कधीतरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. विशालच्या आत्महत्येप्रकरणी निवृत्त न्यायाधीश चौकशी करणार असल्याचे समजते.



विशालवर आधीपासूनच दोन विनयभंग, मुलावर लैंगिक अत्याचार, दोन वेळा मारामारी आणि एक जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल होते. हे सहा गुन्हे केलेल्या आणि तडीपारीचा अनुभव घेतलेल्या विशालने कल्याणमध्ये तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केले, नंतर तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली. यानंतर विशालने पत्नीच्या मदतीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. हे कृत्य केल्यानंतर विशाल शेगावला जाऊन लपला होता. पण नोकरीच्या ठिकाणी रजा मिळवे कठीण होते आणि पैसे आवश्यक होते म्हणून विशालची पत्नी कल्याणच्या घरीच थांबली होती. बेपत्ता मुलीची चौकशी करत पोलीस आले त्यावेळी त्यांना विशालच्या घराच्या जवळ रक्ताचे डाग दिसले. या प्रकरणी कसून चौकशी केल्यावर अखेर विशालच्या पत्नीने सर्व माहिती दिली. यानंतर पोलिसांनी विशालला शेगावमध्ये जाऊन अटक केली होती. विशालला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे त्याची रवानगी तळोजा कारागृहात झाली होती. तिथेच त्याने आत्महत्या केली.



विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली होती. पहिल्या दोन्ही लग्नांनंतर काही काळाने त्याच्या पत्नी निघून गेल्या होत्या. तिसरी पत्नी - साक्षी ही खासगी बँकेत नोकरी करत होती आणि त्याच्या सोबतच होती. विशालने जेव्हा तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केले, नंतर तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली त्यावेळी साक्षी घाबरली होती. पण विशाल सोडून देईल या भीतीपोटी तिने मृतदेह नष्ट करण्यासाठी विशालला मदत केली होती.
Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा