RR vs RCB, IPL 2025: राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यक

  39

मुंबई(ज्ञानेश सावंत) : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. बेंगळुरूचा संघ तीन सामने जिंकून गुण तक्त्यात पाचव्या स्थानावर आहे तर राजस्थानचा संघ दोन सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात राजस्थान व बेंगळुरू दोघांसाठी विजय आवश्यक आहे. परंतु दोघांची कामगिरी पाहता राजस्थानसाठी बेंगळुरू थोडा कठीणच आहे. बेंगळुरूचा आक्रमकपणा त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात नक्कीच मदत करेल.


आता पर्यंत ज्यावेळी त्यांनी सामना जिंकला आहे त्यावेळी पहिली फलंदाजी घेऊन समोरच्या संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या उलट परिस्थिती राजस्थान रॉयल्सची आहे ते धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरत आहेत. गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला शेवटी एका तेज गोलंदाजाची उणीव भासत होती. संदीप शर्मा शेवटच्या षटकात संघाला महाघडा गोलंदाज ठरत आहे.


राजस्थानला गोलंदाजाची रणनीती बदलण्याची गरज आहे. जोफ्रा आर्चर सोबत एका नव्या चेहऱ्याची क्रिकेट रसिक वाट पाहत आहेत. जोफ्रा आर्चरचा सुरवातीचा स्पेल बेगलूरूसाठी धोकादायक ठरू शकतो.
चला तर जाणून घेऊ या आयपीएल मधील आजच्या सामन्यात कोणत्या संघाची सरशी होणार

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र