RR vs RCB, IPL 2025: राजस्थान रॉयल्सला विजय आवश्यक

मुंबई(ज्ञानेश सावंत) : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. बेंगळुरूचा संघ तीन सामने जिंकून गुण तक्त्यात पाचव्या स्थानावर आहे तर राजस्थानचा संघ दोन सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात राजस्थान व बेंगळुरू दोघांसाठी विजय आवश्यक आहे. परंतु दोघांची कामगिरी पाहता राजस्थानसाठी बेंगळुरू थोडा कठीणच आहे. बेंगळुरूचा आक्रमकपणा त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात नक्कीच मदत करेल.


आता पर्यंत ज्यावेळी त्यांनी सामना जिंकला आहे त्यावेळी पहिली फलंदाजी घेऊन समोरच्या संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या उलट परिस्थिती राजस्थान रॉयल्सची आहे ते धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरत आहेत. गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला शेवटी एका तेज गोलंदाजाची उणीव भासत होती. संदीप शर्मा शेवटच्या षटकात संघाला महाघडा गोलंदाज ठरत आहे.


राजस्थानला गोलंदाजाची रणनीती बदलण्याची गरज आहे. जोफ्रा आर्चर सोबत एका नव्या चेहऱ्याची क्रिकेट रसिक वाट पाहत आहेत. जोफ्रा आर्चरचा सुरवातीचा स्पेल बेगलूरूसाठी धोकादायक ठरू शकतो.
चला तर जाणून घेऊ या आयपीएल मधील आजच्या सामन्यात कोणत्या संघाची सरशी होणार

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख