Mumbai water crisis : ऐन उन्हाळ्यात टँकर संघटनेचा संप, मुंबईकर चिंतेत

  84

मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने (Mumbai Water Tanker Association or MWTA) संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भरमसाठ भूजल उपसा टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनला काही अटी घातल्या आहेत. या अटींच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे.



भूजलस्रोत हा किमान २०० चौरस मीटरच्या भूखंडावर असेल तरच त्याचा वापर पाणी घेण्यासाठी करता येईल, अशी अट मुंबई महापालिकेने टँकरवाल्यांसाठी लागू केली आहे. या अटीला मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा विरोध आहे. मुंबईत ही अट कशी मान्य करायची आणि एवढा मोठा भूखंड कुठून आणायचा ? असा प्रश्न मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने उपस्थित केला आहे. उन्हाळ्यात जिथे पाणी टंचाई आहे तिथल्या नागरिकांच्या सोयीसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याकरिता टँकरना भूजलस्रोतातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा हा करावा लागतो. महापालिकेच्या अटीचे पालन करायचे ठरवले तर मुंबईकरांसाठी शहराबाहेरुन पाणी आणावे लागेल. हे करणे वेळखाऊ आणि खर्चिक आहे. यामुळे मुंबई महापालिकेने भूजलस्रोत हा किमान २०० चौरस मीटरच्या भूखंडावर असावा ही अट मागे घेण्याची मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केली आहे.





सध्या एप्रिल महिना सुरू आहे. आताच मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अजून पूर्ण मे महिना बाकी आहे. यानंर जून उजाडणार आहे. यामुळे पाण्याच्या टँकरवर कडक निर्बंध नको. एकावेळी जास्तीत जास्त पाणी भूजलस्रोतातून उपसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी टँकरच चालक - मालक करत आहेत. मागणी अमान्य झाली अथवा दीर्घ काळ रेंगाळली तर बेमुदत संप करू, जून महिन्यात अनेकदा मुंबईकरांना काही दिवस तीव्र पाणीटंचाई जाणवते. या काळात संप सुरू असेल मुंबईकरांचे हाल होतील. हा त्रास टाळण्यासाठी लवकर तोडगा काढावा अशी मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केली आहे. मुंबईतील टँकर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे बाजू मांडू, यातून तोडगा निघेल, असा विश्वास मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना