Mumbai water crisis : ऐन उन्हाळ्यात टँकर संघटनेचा संप, मुंबईकर चिंतेत

  64

मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने (Mumbai Water Tanker Association or MWTA) संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भरमसाठ भूजल उपसा टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई वॉटर टँकर असोसिएशनला काही अटी घातल्या आहेत. या अटींच्या विरोधात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे.



भूजलस्रोत हा किमान २०० चौरस मीटरच्या भूखंडावर असेल तरच त्याचा वापर पाणी घेण्यासाठी करता येईल, अशी अट मुंबई महापालिकेने टँकरवाल्यांसाठी लागू केली आहे. या अटीला मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा विरोध आहे. मुंबईत ही अट कशी मान्य करायची आणि एवढा मोठा भूखंड कुठून आणायचा ? असा प्रश्न मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने उपस्थित केला आहे. उन्हाळ्यात जिथे पाणी टंचाई आहे तिथल्या नागरिकांच्या सोयीसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याकरिता टँकरना भूजलस्रोतातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा हा करावा लागतो. महापालिकेच्या अटीचे पालन करायचे ठरवले तर मुंबईकरांसाठी शहराबाहेरुन पाणी आणावे लागेल. हे करणे वेळखाऊ आणि खर्चिक आहे. यामुळे मुंबई महापालिकेने भूजलस्रोत हा किमान २०० चौरस मीटरच्या भूखंडावर असावा ही अट मागे घेण्याची मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केली आहे.





सध्या एप्रिल महिना सुरू आहे. आताच मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अजून पूर्ण मे महिना बाकी आहे. यानंर जून उजाडणार आहे. यामुळे पाण्याच्या टँकरवर कडक निर्बंध नको. एकावेळी जास्तीत जास्त पाणी भूजलस्रोतातून उपसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी टँकरच चालक - मालक करत आहेत. मागणी अमान्य झाली अथवा दीर्घ काळ रेंगाळली तर बेमुदत संप करू, जून महिन्यात अनेकदा मुंबईकरांना काही दिवस तीव्र पाणीटंचाई जाणवते. या काळात संप सुरू असेल मुंबईकरांचे हाल होतील. हा त्रास टाळण्यासाठी लवकर तोडगा काढावा अशी मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने केली आहे. मुंबईतील टँकर संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे बाजू मांडू, यातून तोडगा निघेल, असा विश्वास मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.