Bhushan Gavai : नागपूरचे भूषण गवई होणार सरन्यायाधीश

नागपूर : सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. नागपूरचे भूषण गवई हे देशाचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहे. ते मूळचे नागपूरकर आहेत. भूषण गवई हे विद्यमान सरन्यायाधीशांच्या नंतरचे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या दिवशीच भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. या निमित्ताने न्यायमूर्ती एम. हिदायतुल्लाह आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचा आणखी एक सदस्य सरन्यायाधीश होणार आहे.



संजीव खन्ना यांच्या आधी सरन्यायाधीश पद भूषवणारे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सुद्धा महाराष्ट्राचेच होते.

कारकिर्द

न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला.

वकिलीला सुरुवात १६ मार्च १९८५ रोजी केली.

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता आणि माजी न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्यासोबत १९८७ पर्यंत काम केले.

न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात १९८७ ते १९९० या काळात स्वतंत्रपणे वकिली केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी १९९० जास्त वकिली केली.

न्यायमूर्ती भूषण गवई हे नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते.

भूषण गवई ऑगस्ट १९९२ ते १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती.

नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून १७ जानेवारी २००० मध्ये भूषण गवई यांची नियुक्ती

उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची १४ नोव्हेंबर २००३ मध्ये बढती

भूषण गवई यांची १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची २४ मे २०१९ रोजी नियुक्ती
Comments
Add Comment

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट