DC vs MI, IPL 2025: मुंबईला विजयाचा सूर गवसला, दिल्लीला १२ धावांनी हरवले

Share

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या २९व्या सामन्यात अखेर मुंबईला विजयी सूर गवसला आहे. सलग ४ सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर दिल्लीविरुद्ध दिल्लीच्याच मैदानात विजय मिळवण्यास मुंबईला यश मिळाले आहे. मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईने दिल्लीला १२ धावांनी हरवत आपल्या पराभवाची मालिका खंडित केली आहे.

तिलक वर्माच्या धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०५ धावा केल्या होत्या. तिलक वर्माने जबरदस्त खेळ करताना ३३ बॉलमध्ये ५९ धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

त्याआधी सलामीसाठी आलेला रोहित शर्मा पुन्हा अयशस्वी ठरला. त्याने १८ धावा केल्या. रियान रिकल्टनने २५ बॉलमध्ये ४१ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने यादवने फटकेबाजी करताना २८ बॉलमध्ये ४० धावा तडकावल्या. नमन धीरने नाबाद ३८ धावा केल्या. शेवटच्या बॉलवर विल जॅक्स आणि नमन धीर यांनी धावून ४ धावा काढल्या. दिल्लीकडून विप्रज निगम आणि कुलदीप यादवने २ धावा ठोकल्या.

मुंबईने दिलेले हे आव्हान खरंतर दिल्लीसाठी मोठे नव्हते. दिल्लीच्या करूण नायरने ४० बॉलमध्ये ८९ धावांची दमदार खेळी केली. मात्र ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली. शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीचे विकेट पटापट गेले आणि दिल्लीचा पराभव झाला. शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीचे ३ विकेट झटपट पडले.

Recent Posts

RCB vs PBKS, IPL 2025: बंगलोरच्या मैदानावर पंजाब किंग्सचा ‘रॉयल’ विजय

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…

6 hours ago

युनेस्कोच्या यादीत भगवद्गीतेचा समावेश

नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…

8 hours ago

हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक

घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…

8 hours ago

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…

8 hours ago

नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…

8 hours ago

हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…

9 hours ago