DC vs MI, IPL 2025: मुंबईला विजयाचा सूर गवसला, दिल्लीला १२ धावांनी हरवले

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या २९व्या सामन्यात अखेर मुंबईला विजयी सूर गवसला आहे. सलग ४ सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर दिल्लीविरुद्ध दिल्लीच्याच मैदानात विजय मिळवण्यास मुंबईला यश मिळाले आहे. मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईने दिल्लीला १२ धावांनी हरवत आपल्या पराभवाची मालिका खंडित केली आहे.


तिलक वर्माच्या धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०५ धावा केल्या होत्या. तिलक वर्माने जबरदस्त खेळ करताना ३३ बॉलमध्ये ५९ धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले.


त्याआधी सलामीसाठी आलेला रोहित शर्मा पुन्हा अयशस्वी ठरला. त्याने १८ धावा केल्या. रियान रिकल्टनने २५ बॉलमध्ये ४१ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने यादवने फटकेबाजी करताना २८ बॉलमध्ये ४० धावा तडकावल्या. नमन धीरने नाबाद ३८ धावा केल्या. शेवटच्या बॉलवर विल जॅक्स आणि नमन धीर यांनी धावून ४ धावा काढल्या. दिल्लीकडून विप्रज निगम आणि कुलदीप यादवने २ धावा ठोकल्या.


मुंबईने दिलेले हे आव्हान खरंतर दिल्लीसाठी मोठे नव्हते. दिल्लीच्या करूण नायरने ४० बॉलमध्ये ८९ धावांची दमदार खेळी केली. मात्र ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली. शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीचे विकेट पटापट गेले आणि दिल्लीचा पराभव झाला. शेवटच्या षटकांमध्ये दिल्लीचे ३ विकेट झटपट पडले.
Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए