फॅक्ट चेक : रेल्वेच्या तत्काळ तिकीट नियमांत खरंच बदल झालाय का?

नवी दिल्ली : १५ एप्रिल २०२५ पासून रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? खरचं रेल्वेच्या तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत का?







काय आहे व्हायरल मेसेजचा दावा?




  • एसी क्लाससाठी तात्काळ बुकिंग सकाळी १० ऐवजी ११ वाजता सुरू होईल.




  • नॉन-एसी बुकिंग ११ ते १२ दरम्यान होईल.




  • प्रीमियम तात्काळ बुकिंग १०:३० वाजता सुरू होईल.




  • सकाळी १० ते १२ या वेळेत एजंट बुकिंगवर बंदी घालण्यात आली आहे.









आयआरसीटीसीचं अधिकृत स्पष्टीकरण काय आहे?


११ एप्रिल २०२५ रोजी, IRCTC ने त्यांच्या अधिकृत @IRCTCofficial X (पूर्वी ट्विटर) हँडलवरून याबाबत स्पष्टीकरण देत, हे सर्व दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.





  • तत्काळ बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.




  • एजंट बुकिंगच्या वेळेतही कोणतेही बदल झालेले नाहीत.








तात्काळ तिकीट बुकिंगची सध्याची वेळ (जैसे थे):




  • एसी क्लास (2A/3A/CC/EC/3E): सकाळी १०:०० वाजता, प्रवासाच्या एक दिवस आधी




  • नॉन-एसी क्लास (SL/FC/2S): सकाळी ११:०० वाजता, प्रवासाच्या एक दिवस आधी








फॅक्ट चेक निष्कर्ष:


व्हायरल होणारा मेसेज फेक आहे. IRCTC किंवा रेल्वेने तत्काळ तिकिट नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहावे आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा.




Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन