फॅक्ट चेक : रेल्वेच्या तत्काळ तिकीट नियमांत खरंच बदल झालाय का?

  43

नवी दिल्ली : १५ एप्रिल २०२५ पासून रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल होणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल होणारा मेसेज खरा आहे का? खरचं रेल्वेच्या तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत का?







काय आहे व्हायरल मेसेजचा दावा?




  • एसी क्लाससाठी तात्काळ बुकिंग सकाळी १० ऐवजी ११ वाजता सुरू होईल.




  • नॉन-एसी बुकिंग ११ ते १२ दरम्यान होईल.




  • प्रीमियम तात्काळ बुकिंग १०:३० वाजता सुरू होईल.




  • सकाळी १० ते १२ या वेळेत एजंट बुकिंगवर बंदी घालण्यात आली आहे.









आयआरसीटीसीचं अधिकृत स्पष्टीकरण काय आहे?


११ एप्रिल २०२५ रोजी, IRCTC ने त्यांच्या अधिकृत @IRCTCofficial X (पूर्वी ट्विटर) हँडलवरून याबाबत स्पष्टीकरण देत, हे सर्व दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.





  • तत्काळ बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही.




  • एजंट बुकिंगच्या वेळेतही कोणतेही बदल झालेले नाहीत.








तात्काळ तिकीट बुकिंगची सध्याची वेळ (जैसे थे):




  • एसी क्लास (2A/3A/CC/EC/3E): सकाळी १०:०० वाजता, प्रवासाच्या एक दिवस आधी




  • नॉन-एसी क्लास (SL/FC/2S): सकाळी ११:०० वाजता, प्रवासाच्या एक दिवस आधी








फॅक्ट चेक निष्कर्ष:


व्हायरल होणारा मेसेज फेक आहे. IRCTC किंवा रेल्वेने तत्काळ तिकिट नियमांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नागरिकांनी अशा अफवांपासून सावध राहावे आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा.




Comments
Add Comment

नववी नापास रिंकू सिंह झाला शिक्षण अधिकारी

लखनऊ : कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०२५ च्या लिलावात तीन कोटी रुपये मोजून ज्या रिंकू सिंहला आपल्यासोबतच

CBSE 10th Board Exam New Rules : CBSC विद्यार्थ्यांना आधार! सीबीएसई दहावीची परीक्षा २०२६ पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डानं दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. CBSEच्या

Uttarakhand: रुद्रप्रयागमध्ये अलकनंदा नदीत कोसळली बस, बद्रीनाथ हायवेवर मोठा अपघात

डेहराडून: उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग-बद्रीनाथ हायवेवर घोलतीर जवळ भीषण रस्ते अपघात झाल्याची माहिती समोर येत

Himachal Pradesh: हिमाचलमध्ये ढगफुटी झाल्याने हाहाकार! अचानक आलेल्या पुराने २ जणांचा मृत्यू, २० जण गेले वाहून

मंडी: हिमाचल प्रदेशात बुधवारी ढगफुटी झाल्याने अचानक पूर आला आणि मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण

CBSE दहावीच्या बोर्ड परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार

नवी दिल्ली : सीबीएसई दहावीच्या बोर्डाची परीक्षा २०२६ पासून आता वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. केंद्रीय

कधी उडणार भारतात उतरलेले इंग्लंडचे F35B विमान ?

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक शक्तिशाली लढाऊ विमानांमध्ये एफ ३५ बी स्टेल्थ लाइटनिंग टू लढाऊ विमानाचा समावेश होतो.