Hanuman Jayanti : आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी दान करा या वस्तू

  75

मुंबई : हनुमान जयंती शनिवार १२ एप्रिल रोजी आहे. या निमित्ताने देशभरातली हनुमान मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. हनुमान जयंती निमित्त भक्त श्रद्धेने उपवास करतात, हनुमानाची पूजा करतात. हनुमान मंदिरांमध्ये भजन, किर्तनाचे कार्यक्रम होतात. भक्त मनापासून हनुमानाला प्रार्थना करतात.



अनेकांना कदाचित हे माहिती नसेल की हनुमान जयंतीच्या दिवशी मनापासून दान केल्यास लाभ होतो असे सांगतात. घरात सुख - समृद्धी येते. या निमित्ताने जाणून घ्या हनुमान जयंतीच्या दिवशी काय दान करता येते ?

  1. हळदीचे दान किंवा हळकुंडाचे दान : हनुमान जयंतीच्या दिवशी हळद दान केल्याने घरात धन धान्य समृद्धी येते. सुख शांती नांदते. आर्थिक समृद्धी येते.

  2. धान्याचे दान : हनुमान जयंतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य दान केले तर आयुष्यभर दान करणाऱ्यावर लक्ष्मीची कृपा राहते.

  3. लाडवाचे दान : हनुमानाला लाडू प्रिय. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी लाडवांचे दान केले तर दान करणाऱ्यावर हनुमानाची कृपा राहते. त्या व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून होणारा त्रास दूर होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. अडचणी दूर होतात. प्रगती होते.

  4. फुटाणे आणि गुळाचे दान : हनुमानाला लाडवांव्यतिरिक्त फुटाणे आणि गुळ प्रिय. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी फुटाणे आणि गुळाचे दान केले तर दान करणाऱ्यावर हनुमानाची कृपा राहते. त्या व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून होणारा त्रास दूर होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. अडचणी दूर होतात. प्रगती होते.


हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभर उपवास केला, हनुमानाची भक्ती केली. मनापासून हनुमानाची प्रार्थना केली आणि दानधर्म केला तर संबंधित व्यक्तीवर हनुमानाची कृपा राहते.

अस्वीकरण : ही माहिती इंटरनेट विश्वातून संकलित केली आहे. उपरोक्त माहितीची पडताळणी 'प्रहार'ने केलेली नाही. या माहितीआधारे कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.