Hanuman Jayanti : आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी दान करा या वस्तू

  108

मुंबई : हनुमान जयंती शनिवार १२ एप्रिल रोजी आहे. या निमित्ताने देशभरातली हनुमान मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. हनुमान जयंती निमित्त भक्त श्रद्धेने उपवास करतात, हनुमानाची पूजा करतात. हनुमान मंदिरांमध्ये भजन, किर्तनाचे कार्यक्रम होतात. भक्त मनापासून हनुमानाला प्रार्थना करतात.



अनेकांना कदाचित हे माहिती नसेल की हनुमान जयंतीच्या दिवशी मनापासून दान केल्यास लाभ होतो असे सांगतात. घरात सुख - समृद्धी येते. या निमित्ताने जाणून घ्या हनुमान जयंतीच्या दिवशी काय दान करता येते ?

  1. हळदीचे दान किंवा हळकुंडाचे दान : हनुमान जयंतीच्या दिवशी हळद दान केल्याने घरात धन धान्य समृद्धी येते. सुख शांती नांदते. आर्थिक समृद्धी येते.

  2. धान्याचे दान : हनुमान जयंतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य दान केले तर आयुष्यभर दान करणाऱ्यावर लक्ष्मीची कृपा राहते.

  3. लाडवाचे दान : हनुमानाला लाडू प्रिय. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी लाडवांचे दान केले तर दान करणाऱ्यावर हनुमानाची कृपा राहते. त्या व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून होणारा त्रास दूर होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. अडचणी दूर होतात. प्रगती होते.

  4. फुटाणे आणि गुळाचे दान : हनुमानाला लाडवांव्यतिरिक्त फुटाणे आणि गुळ प्रिय. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी फुटाणे आणि गुळाचे दान केले तर दान करणाऱ्यावर हनुमानाची कृपा राहते. त्या व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून होणारा त्रास दूर होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. अडचणी दूर होतात. प्रगती होते.


हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभर उपवास केला, हनुमानाची भक्ती केली. मनापासून हनुमानाची प्रार्थना केली आणि दानधर्म केला तर संबंधित व्यक्तीवर हनुमानाची कृपा राहते.

अस्वीकरण : ही माहिती इंटरनेट विश्वातून संकलित केली आहे. उपरोक्त माहितीची पडताळणी 'प्रहार'ने केलेली नाही. या माहितीआधारे कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
Comments
Add Comment

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.