Hanuman Jayanti : आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी दान करा या वस्तू

मुंबई : हनुमान जयंती शनिवार १२ एप्रिल रोजी आहे. या निमित्ताने देशभरातली हनुमान मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. हनुमान जयंती निमित्त भक्त श्रद्धेने उपवास करतात, हनुमानाची पूजा करतात. हनुमान मंदिरांमध्ये भजन, किर्तनाचे कार्यक्रम होतात. भक्त मनापासून हनुमानाला प्रार्थना करतात.



अनेकांना कदाचित हे माहिती नसेल की हनुमान जयंतीच्या दिवशी मनापासून दान केल्यास लाभ होतो असे सांगतात. घरात सुख - समृद्धी येते. या निमित्ताने जाणून घ्या हनुमान जयंतीच्या दिवशी काय दान करता येते ?

  1. हळदीचे दान किंवा हळकुंडाचे दान : हनुमान जयंतीच्या दिवशी हळद दान केल्याने घरात धन धान्य समृद्धी येते. सुख शांती नांदते. आर्थिक समृद्धी येते.

  2. धान्याचे दान : हनुमान जयंतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य दान केले तर आयुष्यभर दान करणाऱ्यावर लक्ष्मीची कृपा राहते.

  3. लाडवाचे दान : हनुमानाला लाडू प्रिय. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी लाडवांचे दान केले तर दान करणाऱ्यावर हनुमानाची कृपा राहते. त्या व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून होणारा त्रास दूर होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. अडचणी दूर होतात. प्रगती होते.

  4. फुटाणे आणि गुळाचे दान : हनुमानाला लाडवांव्यतिरिक्त फुटाणे आणि गुळ प्रिय. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी फुटाणे आणि गुळाचे दान केले तर दान करणाऱ्यावर हनुमानाची कृपा राहते. त्या व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून होणारा त्रास दूर होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. अडचणी दूर होतात. प्रगती होते.


हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभर उपवास केला, हनुमानाची भक्ती केली. मनापासून हनुमानाची प्रार्थना केली आणि दानधर्म केला तर संबंधित व्यक्तीवर हनुमानाची कृपा राहते.

अस्वीकरण : ही माहिती इंटरनेट विश्वातून संकलित केली आहे. उपरोक्त माहितीची पडताळणी 'प्रहार'ने केलेली नाही. या माहितीआधारे कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
Comments
Add Comment

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती - मुख्यमंत्री

मुंबई : देशात उद्या, दि. 22 सप्टेंबर पासून दुसऱ्या टप्प्याचे वस्तू व सेवा कर सुधारणा लागू होत असून, या सुधारणा

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची

आता नरिमन पॉईंट ते मिरा-भाईंदर केवळ अर्ध्या तासात

मुंबई: दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरला जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारने

नवरात्रोत्सवात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. संपूर्ण मुंबईत सणाची तयारी जोरात सुरू आहे. शहरभर मंडप,

मुंबईत 'नमो युवा रन' चा जल्लोष!, मुख्यमंत्र्यानी हिरवा झेंडा दाखवत केली दिमाखात सुरुवात

मुंबई: भाजप आणि त्यांची युवा शाखा, भाजयुमो, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून पुढील १५ दिवस "सेवा पंधरवडा" उपक्रम