CSK vs KKR, IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकत्ता नाइट राइडर्स आमने सामने

  90

मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नईला अजूनही लय सापडत नाही आहे. फलंदाजाकडून धावांचा पाठलाग होत नाही आहे. फलंदाजीमध्ये सातत्य नाही आहे. सलामीच्या जोडी कडून संघाला भक्कम सुरुवात करून देता आलेली नाही आहे. कधी रचिन रवींद्र खेळतो तर कॉन्वे ढेपाळतो, कॉन्वे खेळला तर रवींद्र लवकर बाद होतो. मधल्या फळीमध्ये विजय शंकर, ऋतुराज, शिवम हे संघाला सावरण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. धोनीला फिनिशर म्हणून जबाबदारी पार पाडता येत नाही आहे. ऋतुराज गायकवाडला कर्णधार पदाचे डावपेच व्यवस्थित आखता येत नाही आहे. गोलंदाजाचा चांगला वापर करण्यात ऋतुराज कमी पडतो आहे.


कोलकत्ताचा जर विचार करायचा झाला तर त्यांचे प्रयत्न तोकडे पडता आहेत. यपूर्वीचा सामना त्यांनी फक्त चार धावांनी गमावला. आंद्रे रसेलच्या जागेवर त्याना एका नवीन फिनिशरची गरज आहे. ह्या हंगामात एक फिनिशर म्हणून आंद्रे रसेल पुर्णपणे अपयशी ठरला आहे. आजच्या सामन्यात कोलकत्ताचे पारडे चेन्नई पेक्षा जड आहे. कोलकात्याचा संघ मागील सामन्याचा पराजयाचा वचपा आज भरून काढणार. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही बाबतीत कोलकत्ता संघ चेन्नईवर आपले वर्चस्व गाजवेल. चेन्नईला घरच्या मैदानावर कोलकत्त्याच्या फिरकीचा सामना करावा लागेल. कदाचित उलटेही होऊ शकते कारण ह्याच मैदानावर नूर अहम्मदने मुंबईचा पराभव केला होता.


चला तर बघूया चेन्नईच्या मैदानावर कोणाची फिरकी चालते

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र