अमरावती : महावीर जयंतीनिमित्त गोमातेसाठी छप्पन भोग

अमरावती : गोमातेची सेवा करणे हे प्रत्येक हिंदू धर्मीयांचे कर्तव्य आहे, असे सांगत येथील जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने गोमातेला छप्पन भोग अर्पण करण्यात आला. महाराष्ट्रातील या ऐतिहासिक व अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जैन धर्मगुरू भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.


येथील धर्मदाय कॉटन फंड कमिटीमध्ये जैन धर्मीयांनी गौतम प्रसादीचे आयोजन केले होते. त्याचवेळी गोमातेसाठी छप्पन भोगही अर्पण केला. ३१ क्विंटल सामग्रीपासून बनवलेले विविध मिष्टान्न व इतर पदार्थांचा यात समावेश होता. गोमातेसाठीचे हे भोजन जिल्ह्यातील सर्व गोशाळेत पोहोचवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या उपक्रमातून महाराष्ट्रात ‘गो वात्सल्य-गो माता सेवे’चा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे आ. सुलभा खोडके, आ. रवी राणा, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अभिनंदन बँकेचे नवीन चोरडिया आदींनी कौतुक केले आहे. संपूर्ण विश्वाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.



जैन धर्मातील परंपरा व संस्कृतीनुसार जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. भाजीबाजार येथून निघालेली ही फेरी जयस्तंभ चौकात पोहोचल्यानंतर तेथे किर्ती स्तंभाची पूजा करण्यात आली. त्याचवेळी महावीर पाणपोईचे उद्घाटनही करण्यात आले.


अमरावती येथील कार्यक्रमानंतर बडनेरा नवी वस्ती येथील भगवान महावीर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही आमदार रवी राणा यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी भगवान महावीर चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी त्यांनी ५ लाख रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली. आ. रवी राणा यांच्या या घोषणेचे जैन समाजबांधवांनी स्वागत केले.

Comments
Add Comment

Mumbai-Pune ExpressWay : चक्क भाजलेल्या हातांनी रोखला मृत्यू! पेरूच्या खुट्टीनं टळला मोठा अनर्थ; एक छोटी चूक अन् १० किमीचा परिसर झाला असता खाक

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या महाभीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Weather Update: महाराष्ट्रातील वातावरणात बदल, कोकण ते विदर्भापर्यंत पुन्हा अलर्ट, ११ फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

मुंबई: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात बदल दिसून येत आहे. हिवाळी थंड आता बऱ्याच प्रमाणात

छत्रपती संभाजीनगरात १२ वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे इयत्ता १२ वीच्या इंग्रजी

Central Railway : मध्य रेल्वे चालवणार २४ विशेष रेल्वे गाड्या; कुठे कुठे धावणार ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) आणि नागपूर/कोल्हापूर/सावंतवाडी रोड व • लोकमान्य टिळक टर्मिनस

Dombivali news : स्वप्नांचा चक्काचूर! बारावीचा पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, धावत्या ट्रेनमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

डोंबिवली : बारावीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस एका कुटुंबासाठी कधीही भरून न येणारे दु:ख घेऊन आला. डोंबिवली येथील

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न साकार; इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात!

रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी 'एमआयडीसी' रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा