अमरावती : महावीर जयंतीनिमित्त गोमातेसाठी छप्पन भोग

अमरावती : गोमातेची सेवा करणे हे प्रत्येक हिंदू धर्मीयांचे कर्तव्य आहे, असे सांगत येथील जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने गोमातेला छप्पन भोग अर्पण करण्यात आला. महाराष्ट्रातील या ऐतिहासिक व अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जैन धर्मगुरू भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.


येथील धर्मदाय कॉटन फंड कमिटीमध्ये जैन धर्मीयांनी गौतम प्रसादीचे आयोजन केले होते. त्याचवेळी गोमातेसाठी छप्पन भोगही अर्पण केला. ३१ क्विंटल सामग्रीपासून बनवलेले विविध मिष्टान्न व इतर पदार्थांचा यात समावेश होता. गोमातेसाठीचे हे भोजन जिल्ह्यातील सर्व गोशाळेत पोहोचवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या उपक्रमातून महाराष्ट्रात ‘गो वात्सल्य-गो माता सेवे’चा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे आ. सुलभा खोडके, आ. रवी राणा, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अभिनंदन बँकेचे नवीन चोरडिया आदींनी कौतुक केले आहे. संपूर्ण विश्वाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.



जैन धर्मातील परंपरा व संस्कृतीनुसार जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. भाजीबाजार येथून निघालेली ही फेरी जयस्तंभ चौकात पोहोचल्यानंतर तेथे किर्ती स्तंभाची पूजा करण्यात आली. त्याचवेळी महावीर पाणपोईचे उद्घाटनही करण्यात आले.


अमरावती येथील कार्यक्रमानंतर बडनेरा नवी वस्ती येथील भगवान महावीर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही आमदार रवी राणा यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी भगवान महावीर चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी त्यांनी ५ लाख रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली. आ. रवी राणा यांच्या या घोषणेचे जैन समाजबांधवांनी स्वागत केले.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी