अमरावती : महावीर जयंतीनिमित्त गोमातेसाठी छप्पन भोग

  70

अमरावती : गोमातेची सेवा करणे हे प्रत्येक हिंदू धर्मीयांचे कर्तव्य आहे, असे सांगत येथील जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने गोमातेला छप्पन भोग अर्पण करण्यात आला. महाराष्ट्रातील या ऐतिहासिक व अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जैन धर्मगुरू भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.


येथील धर्मदाय कॉटन फंड कमिटीमध्ये जैन धर्मीयांनी गौतम प्रसादीचे आयोजन केले होते. त्याचवेळी गोमातेसाठी छप्पन भोगही अर्पण केला. ३१ क्विंटल सामग्रीपासून बनवलेले विविध मिष्टान्न व इतर पदार्थांचा यात समावेश होता. गोमातेसाठीचे हे भोजन जिल्ह्यातील सर्व गोशाळेत पोहोचवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या उपक्रमातून महाराष्ट्रात ‘गो वात्सल्य-गो माता सेवे’चा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे आ. सुलभा खोडके, आ. रवी राणा, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अभिनंदन बँकेचे नवीन चोरडिया आदींनी कौतुक केले आहे. संपूर्ण विश्वाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.



जैन धर्मातील परंपरा व संस्कृतीनुसार जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. भाजीबाजार येथून निघालेली ही फेरी जयस्तंभ चौकात पोहोचल्यानंतर तेथे किर्ती स्तंभाची पूजा करण्यात आली. त्याचवेळी महावीर पाणपोईचे उद्घाटनही करण्यात आले.


अमरावती येथील कार्यक्रमानंतर बडनेरा नवी वस्ती येथील भगवान महावीर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही आमदार रवी राणा यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी भगवान महावीर चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी त्यांनी ५ लाख रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली. आ. रवी राणा यांच्या या घोषणेचे जैन समाजबांधवांनी स्वागत केले.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ