गेटवे ऑफ इंडिया येथील तिकिटांच्या दरात मनमानी वाढ

मुंबई : मुंबई–मांडवा अंतर बोटीने पार करण्यासाठी १०० ते ३०० रुपये तिकिट दर आकारले जात असताना आता गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर मात्र प्रवाशांकडून याच प्रवासासाठी एक हजार रुपये घेतले जात आहेत. भाजपाचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी ही बाब उघडकीस आणली असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर प्रवासी व पर्यटकांची लूट सुरू असल्याचा आरोप भाजपचे कुलाबा येथील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी राज्य सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला (एमबीपीटी) पत्र पाठवून गेटवे येथील जेट्टी क्रमांक ५ वरील कामकाजाची, तसेच एमबीपीटी आणि मांडवा एलएलपी यांच्यामधील करारातील अटींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


स्पीड बोट सेवांसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. गेट वे ऑफ इंडियावरून मांडवाला जाण्यासाठी प्रति व्यक्ती एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील इतर जेटीवरून त्याच प्रवासासाठी सुमारे १०० ते ३०० रुपये दर आकारतात. त्यामुळे हे तिकिट दर खूपच अवाजवी असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसेच या जेट्टीवर तिकीट दर कुठेही पारदर्शकपणे जाहीर केलेले नाहीत. प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष जागेवरच तिकीट खरेदी करावे लागते, असाही आरोप पत्रात केला आहे.

Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :