गेटवे ऑफ इंडिया येथील तिकिटांच्या दरात मनमानी वाढ

मुंबई : मुंबई–मांडवा अंतर बोटीने पार करण्यासाठी १०० ते ३०० रुपये तिकिट दर आकारले जात असताना आता गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर मात्र प्रवाशांकडून याच प्रवासासाठी एक हजार रुपये घेतले जात आहेत. भाजपाचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी ही बाब उघडकीस आणली असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर प्रवासी व पर्यटकांची लूट सुरू असल्याचा आरोप भाजपचे कुलाबा येथील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी राज्य सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला (एमबीपीटी) पत्र पाठवून गेटवे येथील जेट्टी क्रमांक ५ वरील कामकाजाची, तसेच एमबीपीटी आणि मांडवा एलएलपी यांच्यामधील करारातील अटींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


स्पीड बोट सेवांसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. गेट वे ऑफ इंडियावरून मांडवाला जाण्यासाठी प्रति व्यक्ती एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील इतर जेटीवरून त्याच प्रवासासाठी सुमारे १०० ते ३०० रुपये दर आकारतात. त्यामुळे हे तिकिट दर खूपच अवाजवी असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसेच या जेट्टीवर तिकीट दर कुठेही पारदर्शकपणे जाहीर केलेले नाहीत. प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष जागेवरच तिकीट खरेदी करावे लागते, असाही आरोप पत्रात केला आहे.

Comments
Add Comment

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड

BMC News : वाणीतून नाहीतर भाजपाने करून दाखवले; सुमारे २७० कोटी रूपयांची बचत करत गारगाई पाणी प्रकल्पाला दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही