गेटवे ऑफ इंडिया येथील तिकिटांच्या दरात मनमानी वाढ

मुंबई : मुंबई–मांडवा अंतर बोटीने पार करण्यासाठी १०० ते ३०० रुपये तिकिट दर आकारले जात असताना आता गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर मात्र प्रवाशांकडून याच प्रवासासाठी एक हजार रुपये घेतले जात आहेत. भाजपाचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी ही बाब उघडकीस आणली असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ वर प्रवासी व पर्यटकांची लूट सुरू असल्याचा आरोप भाजपचे कुलाबा येथील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी राज्य सरकार आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला (एमबीपीटी) पत्र पाठवून गेटवे येथील जेट्टी क्रमांक ५ वरील कामकाजाची, तसेच एमबीपीटी आणि मांडवा एलएलपी यांच्यामधील करारातील अटींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


स्पीड बोट सेवांसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. गेट वे ऑफ इंडियावरून मांडवाला जाण्यासाठी प्रति व्यक्ती एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. गेट वे ऑफ इंडिया येथील इतर जेटीवरून त्याच प्रवासासाठी सुमारे १०० ते ३०० रुपये दर आकारतात. त्यामुळे हे तिकिट दर खूपच अवाजवी असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसेच या जेट्टीवर तिकीट दर कुठेही पारदर्शकपणे जाहीर केलेले नाहीत. प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष जागेवरच तिकीट खरेदी करावे लागते, असाही आरोप पत्रात केला आहे.

Comments
Add Comment

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय