प्रहार    

Murshidabad Voilence : नव्या वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी २२ जणांना अटक

  70

Murshidabad Voilence : नव्या वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी २२ जणांना अटक कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सध्या परिस्थिती शांत आणि नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलिस धिकाऱ्यांनी सांगितले.



वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये ८ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे. यापैकी ८ आरोपींना पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. याबाबत जांगीपूरचे पोलिस अधीक्षक (एसपी) आनंद रॉय म्हणाले की, पोलिसांनी हिंसाचाराची स्वतःहून दखल घेतली आहे आणि गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या ८ एप्रिल रोजी वक्फ सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजकंटकांनी अनेक वाहनांना आग लावली होती. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश होता. या संघर्षादरम्यान निदर्शकांनी दगडफेकही केली, ज्यामुळे अनेक पोलिस जखमी झाले. दरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत १२ याचिका दाखल झाल्या आहेत. आगामी १६ एप्रिल रोजी न्यायालय १० याचिकांवर सुनावणी करणार आहे. त्याच वेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभरात निषेध करणार आहे.
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या