Murshidabad Voilence : नव्या वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी २२ जणांना अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सध्या परिस्थिती शांत आणि नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलिस धिकाऱ्यांनी सांगितले.



वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये ८ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे. यापैकी ८ आरोपींना पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. याबाबत जांगीपूरचे पोलिस अधीक्षक (एसपी) आनंद रॉय म्हणाले की, पोलिसांनी हिंसाचाराची स्वतःहून दखल घेतली आहे आणि गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या ८ एप्रिल रोजी वक्फ सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजकंटकांनी अनेक वाहनांना आग लावली होती. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश होता. या संघर्षादरम्यान निदर्शकांनी दगडफेकही केली, ज्यामुळे अनेक पोलिस जखमी झाले. दरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यापासून, सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत १२ याचिका दाखल झाल्या आहेत. आगामी १६ एप्रिल रोजी न्यायालय १० याचिकांवर सुनावणी करणार आहे. त्याच वेळी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभरात निषेध करणार आहे.
Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली