Saptashrungi Stampede : सप्तश्रृंगी गडावर चेंगराचेंगरी! गर्दीचे नियोजन हुकले, पोलिसांची तारांबळ

  88

नाशिक : चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगगडावर आदिमायेचे दर्शनासाठी (Saptashrungi Darshan) बुधवार रात्रीपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र देवीच्या दर्शनासाठी झालेल्या भाविकांच्या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीमध्ये झाले आहे. आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याने गर्दीचे नियोजन (Saptashrungi Stampede) चुकले. त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे प्रशासन आणि पोलिस व्यवस्थेची मात्र धावपळ झाल्याचे दिसून आले. भाविकांच्या या गर्दीमुळे मंदिर प्रशासन, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाची मात्र तारांबळ उडाली आहे.



 मिळालेल्या माहितीनुसार, आदिमायेचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून दर्शनी मार्गात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी बॅरिकेड्स तुटल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी लहान मुले, वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागला. गर्दीचे नियोजन न झाल्याने भाविकांनी पोलिस आणि सप्तशृंग गड व्यवस्थापन विरोधात नाराजी व्यक्त केली. उत्साही भाविकांनी आदिमायेचा गजर करत ‘अंबे माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण गड परिसर दुमदुमून टाकला. मात्र भाविकांच्या वाढलेल्या या गर्दीमुळे भवानी चौकातील व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले. (Saptashrungi Stampede)



सप्तश्रृंगीच्या पहिल्या पायरीजवळच भाविकांची गर्दी


सप्तश्रृंगी गडावर सध्या चैत्रोत्सव सुरू आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेला हा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत सुरू असतो. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने दोन ते तीन बैठका घेतल्या असल्या तरी निर्णयांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे वाढलेल्या गर्दीचे नियोजन करणे आवश्यक असताना प्रशासन कुठेतरी कमी पडतेय का, असे वाटतेय. सप्तश्रृंगीच्या पहिल्या पायरीजवळच भाविकांची मोठी गर्दी झाली. त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून गर्दीचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र गर्दीच एवढी होती की तो प्रयत्न अयशस्वी झाला. या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची एक लाईन आणि दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची दुसरी लाईन करणे आवश्यक होते. तसेच बाजूच्या दुकानांच्या गर्दीसाठीही वेगळे नियोजन करणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नसल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. (Saptashrungi Stampede)

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित