Smartphone: उन्हाळ्यात स्मार्टफोन होतोय खूप गरम? वापरा या टिप्स

मुंबई: उकाड्याने आपले प्रचंड रूप दाखवणे सुरू केले आहे. या उकाड्यामुळे केवळ माणूस अथवा प्राणीच त्रस्त झालेले नाहीत तर स्मार्टफोनही त्रस्त होत आहेत. अनेकांची तक्रार आहे की त्यांचा स्मार्टफोन ओव्हरहीट होत आहे. फोनच्या ओव्हरहीटचा अर्थ म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होणे.


तसेच स्मार्टफोनमधील एखादा पार्ट्स खराबही होऊ शकतो. अशातच तुम्ही कसा ठेवाल तुमचा स्मार्टफोन कूल कूल... या आहेत टिप्स


सगळ्यात आधी डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून आपल्या स्मार्टफोनचे रक्षण करा. फोनला कधीही कारच्या डॅशबोर्डवर ठेवू नका. यामुळे हँडसेट खराबही होऊ शकतो.


स्क्रीनची ब्राईटनेस कमी ठेवून तुम्ही स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचवू शकता. सोबतच ब्लूटूथ, वायाय आणि दुसरे फीचर्सही काम नसताना बंद करा.


जर तुमचा फोन खूप गरम होत असेल तर तो काही वेळासाठी एअरोप्लेन मोडवर ठेवा. यामुळे फोन लवकर थंड होईल.


चार्जिंग करताना स्मार्टफोनचे कव्हर काढा. यामुळे फोन जास्त गरम होणार नाही. तसेच तुम्हाला ओव्हरहिटींगचा त्रासही होणार नाही.


याशिवाय तुम्ही फोनसोबत कूलिंगचा फॅनचा वापर करा. अशातच गेमिंग आणि चार्जिंगवेळेस फोन थंड राहील. जिथे जागा जास्त गरम आहे अशा ठिकाणी आपला फोन चार्जिंग करू नका.


Comments
Add Comment

Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर भरधाव पोर्शेचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे वाचले दोघांचे प्राण

मुंबई(Mumbai) : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका आलिशान पोर्शे कारचा भीषण अपघात

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल

Juhu Chowpatty : जुहू समुद्रकिना-याची स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक

मागील एक महिन्यांपासून जेसीबी, डंपरचे कंत्राट आले होते संपुष्टात मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील पावसाळ्यात

Mumbai's water stock : मुंबईचा पाणी साठा ५० टक्के पार; सर्व धरणांमध्ये सध्या ५०.७७ टक्के पाणीसाठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याचा साठा जा मागील काही दिवसांपासून ५०

Desalinate Seawater : समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी जलबोगद्याच्या कामासाठी कंत्राटदाराची निवड

पंपिंग स्टेशनपासून ते कांदिवली महावीर नगरपर्यंत उभारणार जलबोगदा मुंबई (सचिन धानजी) : मनोरी येथे समुद्राच्या