RCB vs DC, IPL 2025: अव्वल स्थानी कोण?

मुंबई: आजचा सामना गुण तक्त्यामधील चार अव्वल स्थानांवरील दोन संघादरम्यान होणार आहे. दिल्ली कैपिटल अठराव्या हंगामातील सुरवातीचे तिन्ही सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बेंगळुरू चार पैकी तीन सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज जर दिल्ली जिंकली तसेच त्यांचा रनरेट गुजरातपेक्षा चांगला असेल तर ती गुण तक्त्यात पहिल्याच क्रमांकावर येईल परंतु बेंगळुरू जिंकली आणि त्यांचा रनरेट चांगला असेल तर तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतील.


दोन्ही संघ एकमेकास आव्हान देऊ शकतील. दोघाकडे जबरदस्त फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी आहे. फिल सॉल्ट, विराट कोहली, पडीकल, पाटीदार असे एकापेक्षाएक फलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला दिल्लीकडे फ्रेझर, डुप्लेसिस, के एल राहुल, स्टब्स,यांच्या सारखे अनुभवी फलंदाज आहेत. दोघांचीही गोलंदाजी भन्नाट आहे, तेज गोलंदाज व फिरकी असा समतोल आहे.


बेंगळुरुच्या खेळपट्टीवर दोन्ही संघ आपले आयपीएलवरचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील. आजच्या सामन्यात नानेफेकीचा कौल महत्त्वाचा असेल कारण जो नाणेफेक जिंकेल तो संघ प्रथम गोलंदाजी घेईल व समोरच्या संघावर दबाव टाकेल. तेज गोलंदाजीमध्ये दिल्लीचा संघ हा बेगलूरूपेक्षा वरचढ आहे कारण मिचेल स्टार्कचा सुरवातीचा स्पेल हा भेदक असू शकतो. त्या समोर खेळणे बेंगळुरूसाठी कठीण असेल. याउलट दुसऱ्या सत्रात फिरकी समोर फलंदाजांचा कस लागेल. चला तर बघूया आज कोण वरचढ ठरणार?


Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.