Chembur Firing : चेंबूरमध्ये एका बिल्डरवर गोळीबार, प्रकृती स्थिर

मुंबई : मुंबईच्या चेंबूरमध्ये एका व्यवसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या व्यवसायिकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या चेंबूरमधील मैत्रीपार्क भागात एका बिल्डरवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सद्रुद्दीन खान असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यवसायिकाचे नावं आहे. ते बुधवारी (दि.९) रात्री १०च्या सुमारास दादर येथून मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी सायन पनवेल महामार्गावर चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात त्याची गाडी थांबली होती. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सद्रुद्दीन यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना झेन रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.



या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ही घटना शीव – पनवेल महमार्गावर घडल्याने या मार्गावर रात्री वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वाहनांना वाट मोकळी करून दिली. पोलिसांनी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून रस्त्यावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला