Uttar Pradesh News : अजबच! पैशांसाठी ३० महिन्यांत २५ वेळा झाली आई! ५ वेळा नसबंदी करूनही पुन्हा झाली गर्भवती?

लखनऊ : लखनऊ मधील आरोग्य विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेची ३० महिन्यात २५ वेळा प्रसूती झाली. याच कालावधीत तिची ५ वेळा नसबंदीही झाली. तरीही महिला गर्भवती राहिल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एक महिला ३० महिन्यात २५ वेळा आई झाली. याच कालावधीत तिची ५ वेळा नसबंदी झाली. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागातील गर्भवतींना प्रसुतीनंतर १४०० रुपये, तर शहरातील गर्भवतींना १ हजार रुपये दिले जातात. महिलांना नसबंदीसाठी २ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम महिलांच्या खात्यात थेट जमा होते. उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील फतेहाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्रात आर्थिक ऑडिट सुरु असताना हा घोटाळा उघडकीस आला. या महिलेला २५ वेळा प्रसुती आणि ५ वेळा नसबंदी करण्यासाठी ४५ हजार रुपये देण्यात आले.



या सगळ्या घोटाळ्यात सार्वजनिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान आग्र्यातील फतेहाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षकांच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे. आग्र्याचे मुख्य आरोग्य अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी या प्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. यामध्ये तांत्रिक चूक झाली आहे की जाणूनबुजून याबाबत संपूर्ण चौकशी श्रीवास्तव यांच्याच कडक देखरेखेखाली केली जाणार आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला