Solapur News : धक्कादायक! सोलापुरात विजेच्या धक्क्याने ९वी मधल्या मुलीचा मृत्यू

सोलापूर : हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या राजनंदिनी अनय कांबळे (रा. कोनापुरे चाळ) हिचा घरातील जिन्यावरून वरच्या खोलीत जाताना शॉक लागून मृत्यू झाला आहे. शॉक लागल्यावर कुटुंबीयांनी तिला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण करंट सुटला नाही. डोळ्यादेखत तिचा जीव गेला.


अवकाळी पाऊसही सुरू होता. राजनंदिनी घराच्या वरच्या मजल्यावरील तीन लहान मुलांकडे निघाली होती. घराच्या जिन्याच्या पहिल्याच पायरीवर तिने पाय ठेवला आणि तिला शॉक बसला. सर्व्हिस केबलचा शॉक असल्याने तिला स्वतःची सुटका करून घेता आली नाही. तिच्या घराच्या वरील खोलीत तीन चिमुकली मुले होती, सुदैवाने त्यांना काही झाले नाही. राजनंदिनीला एक भाऊ असून तो इयत्ता अकरावीत आहे. लहान बहीण सातवीत शिकते. त्यांची आई मजुरी करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवते. राजनंदिनीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.




नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा सुद्धा हलू लागल्या होत्या. याचमुळे कोनापुरे चाळीत मरण पावलेल्या राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीच्या घराच्या वरून जाणारी विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला त्याच वेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली हे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीने त्या विद्यार्थिनीला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात हरवले मात्र डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केल्याचे सांगण्यात आले.


दरम्यान कोनापुरे चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत.

Comments
Add Comment

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी