मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं मंगळवारी (दि. ८) निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सलीम यांची प्राणज्योत मालवली.सलीम यांचं निधन कशामुळे झालं, याविषयी कोणतंही कारण अद्याप कळू शकलं नाही. सलीम यांच्या निधनाने बॉलिवूड कलाकार आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सलीम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सलीम अख्तर यांनी निर्माते म्हणून बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली. ‘फूल और अंगारे’, ‘कयामत’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांच्या निर्मितीमागे सलीम अख्तर यांचं मोठं योगदान होतं. याशिवाय १९९७ साली रिलीज झालेल्या ‘राजा की आएगी बारात’ सिनेमाची निर्मिती करुन राणी मुखर्जीला त्यांनी इंडस्ट्रीत लाँच केलं. याशिवाय २००५ साली ‘चाँद सा रोशन चेहरा’ सिनेमातून त्यांनी तमन्ना भाटियाला लाँच केलं होतं.
नवीन टॅलेंटला इंडस्ट्रीत प्रोत्साहन देण्यात सलीम अख्तर यांचं मोलांचं योगदान होतं. बॉलिवूडचा सुवर्णकाळ ज्यांनी बघितला आणि अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती ज्यांनी केली अशा सलीम यांच्या निधनाने कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…