KKR vs LSG, IPL 2025: कोलकत्ता नाइट राइडर्स व लखनऊ सूपर जायंट्स आमने सामने

मुंबई(ज्ञानेश सावंत): आजचे दोन्ही संघ प्रत्येकी दोन सामने जिंकलेले आहेत. दोन्ही संघाची तुलना करायची झाल्यास ते एकमेकांस तुल्य बळ आहेत. लखनऊ व कोलकत्ता या दोन्ही संघांचे फळदाजीवर वर्चस्व आहे. कोलकत्ताकडे वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग सारखे हिटर आहेत त्याच बरोबर सय्यमाने खेळणारे अजिंक्य रहाणे, रघुवंशी आहेत. समोरच्या संघात भेदक सलामीवीर आहेत, मार्श व मकरम सुरवाती पासूनच समोरच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा तोच आक्रमकपणा निकोलस पूरण पुढे चालू ठेवतो.


आजच्या सामन्यात लखनऊ संघाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे अपेक्षित आहे. जर त्यांनी प्रथम फलंदाजी करून २२०-२३० चे आव्हान कोलकत्ता समोर ठेवले तर कदाचित निर्णय लखनऊच्या बाजूने लागू शकतो. धावांचा पाठलाग करताना कोलकत्ताची फलंदाजी कमकुवत पडू शकते कारण आज पर्यंत मागील चार सामन्यात त्यांनी धावांचा पाठलाग करून सामना जिंकलेला नाही.


कोलकत्तासाठी जमेची बाजू म्हणजे आजचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे आणि त्यामुळे कोलकत्ता प्रथम गोलंदाजी घेऊन फिरकीच्या जोरावर सामना लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या