एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापणार

मुंबई (प्रतिनिधी): मुंबईत सध्या असह्य उकाडा सहन करावा लागत असून पुढील दोन ते तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा, उन्हाच्या झळा आणि काहिली यामुळे मुंबईकर अक्षरशः पोळून निघाले आहेत. मुंबईच्या तापमानात सतत चढ उतार सुरू आहेत. अचानक तापमानात वाढ होते तर कधी अचानक घट होते. या वातावरणाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.


मार्च महिना सुरू झाला तरी तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-जास्त होत असल्याचेही दिसून आले. तीच परिस्थिती या महिन्यातही कायम आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी अंश ३३.९ सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तापमान कमी नोंदले गेले असले तरी, कोरड्या, उष्ण वाऱ्यांनी उकाड्याची जाणीव अधिक त्रासदायक झाली आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमानाचा पारा २४ ते २६ अंशापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सकाळच्या वेळीही अस्वस्थता जाणवू शकते. तर, कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशापर्यंत असेल. या कालावधीत आकाश निरभ्र असू शकेल, त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप होऊ शकेल.


मागील आठवड्यात मुंबईतील तापमानात सलग चार ते पाच दिवस घट झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना तापमान दिलासा मिळाला होता. मात्र, उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस मुंबईकरांना हा उकाडा सहन करावा लागणार आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्पाचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटांची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ भाजप नगरसेवकांनी पकडला गॅस सिलेंडर आणि गुटख्याचा अवैध साठा

महापौराने दिले कारवाईचे सक्त आदेश मुंबई ; लोकमान्य टिळक टर्मिनस (एल टी टी ) जवळील स्वराज चौकात शनिवारी २० जून २०२६

PM Kisan : राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी साहेब

ST bus : ४० वारकरी एकत्र आल्यास थेट गावातूनच सुटणार 'लालपरी'

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार ५०० विशेष बसेस; महिलांना ५० टक्के तर ज्येष्ठांना मोफत सेवा मुंबई :

Piyush Goyal : सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतला मोदी सरकारच्या तपपूर्तीचा आढावा भारतीयांचे सामर्थ्य, समृद्धी,

Eknath Shinde : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायासाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निर्देशानंतर सीबीआय उच्च न्यायालयात करणार अपील मुंबई : पवनराजे निंबाळकर

Amit Shah : शिवसेना एकच, एकनाथ शिंदेंची!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; भारत देश धर्मशाळा नाही, घुसखोरांना हद्दपार करणारच मुंबई : "एकनाथ शिंदे यांच्या