MI vs RCB :दुखापतग्रस्त मुंबई विरुद्ध रॉयल बंगळूरु

मुंबई(ज्ञानेश सावंत): मुंबईचे शुक्लकष्ट काही कमो होत नाही, रोज नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अगोदरच मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल कधी खेळणार याकडे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. हिटमॅन रोहित शर्मा गुडघ्याच्या दुखापतीमुळे परवाचा सामना खेळू शकला नाही व आजचा सामना खेळणार की नाही याबाबत शंका आहे. दुष्काळात तेरावा महिना. त्याप्रमाणे तिलक वर्माला परवाच्या सामन्यादरम्यान दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले.


कागदावर भरभक्कम दिसणारा संघ आज विजयासाठी झगडताना दिसतो आहे. मागील तीन पराभवांमुळे मुंबई इंडियन्स संघाचे नक्कीच खच्चीकरण झाले आहे. आजचा सामना घरच्या मैदानावर होत असला तरी मुंबईसाठी विजय अशक्य दिसतो आहे कारण प्रतिस्पर्धी संघ हा बलवान आहे. मुंबईला चांगल्या सलामीची गरज आहे; परंतु सध्या मुंबईला सलामीच्या फलंदाजाची चिंता आहे. गेल्या सामन्यात रोहितच्या गैरहजेरीत विल जंक्सला सलामीला पाठविले; परंतु तो पाचच धावा करून बाद झाला. त्यामुळे आज मुंबई इंडियन्सच्या सलामीला कोणता फलंदाज येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बंगळूरुने अठराव्या हंगामातील तीनपैकी दोन सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांची कामगिरी खराब झाली. मोठे फटके मारण्याच्या नादात त्यांचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले, तरीही त्या संघाकडे मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. आजचा सामना हा वानखेडे मैदानावर होत आहे जे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. जो संघ नाणेफेक जिंकेल तो फलंदाजी करून समोरच्या संघाला जास्त धावांचे आव्हान देईल. बंगळूरुची सलामीची जोडी चांगली सुरुवात करून देऊ शकते. विराट व सॉल्ट दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीचे तुल्यबळ दोन्ही बाजूला सारखेच आहे. तरीही आजच्या सामन्यात बंगळुरुचे वर्चस्व राहील कारण अजूनही मुंबईचा संघ हार्दिक पंडयाच्या नेतृत्वाखाली चाचपडताना दिसत आहे.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून