MI vs RCB :दुखापतग्रस्त मुंबई विरुद्ध रॉयल बंगळूरु

मुंबई(ज्ञानेश सावंत): मुंबईचे शुक्लकष्ट काही कमो होत नाही, रोज नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अगोदरच मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल कधी खेळणार याकडे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. हिटमॅन रोहित शर्मा गुडघ्याच्या दुखापतीमुळे परवाचा सामना खेळू शकला नाही व आजचा सामना खेळणार की नाही याबाबत शंका आहे. दुष्काळात तेरावा महिना. त्याप्रमाणे तिलक वर्माला परवाच्या सामन्यादरम्यान दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले.


कागदावर भरभक्कम दिसणारा संघ आज विजयासाठी झगडताना दिसतो आहे. मागील तीन पराभवांमुळे मुंबई इंडियन्स संघाचे नक्कीच खच्चीकरण झाले आहे. आजचा सामना घरच्या मैदानावर होत असला तरी मुंबईसाठी विजय अशक्य दिसतो आहे कारण प्रतिस्पर्धी संघ हा बलवान आहे. मुंबईला चांगल्या सलामीची गरज आहे; परंतु सध्या मुंबईला सलामीच्या फलंदाजाची चिंता आहे. गेल्या सामन्यात रोहितच्या गैरहजेरीत विल जंक्सला सलामीला पाठविले; परंतु तो पाचच धावा करून बाद झाला. त्यामुळे आज मुंबई इंडियन्सच्या सलामीला कोणता फलंदाज येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बंगळूरुने अठराव्या हंगामातील तीनपैकी दोन सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांची कामगिरी खराब झाली. मोठे फटके मारण्याच्या नादात त्यांचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले, तरीही त्या संघाकडे मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. आजचा सामना हा वानखेडे मैदानावर होत आहे जे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. जो संघ नाणेफेक जिंकेल तो फलंदाजी करून समोरच्या संघाला जास्त धावांचे आव्हान देईल. बंगळूरुची सलामीची जोडी चांगली सुरुवात करून देऊ शकते. विराट व सॉल्ट दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीचे तुल्यबळ दोन्ही बाजूला सारखेच आहे. तरीही आजच्या सामन्यात बंगळुरुचे वर्चस्व राहील कारण अजूनही मुंबईचा संघ हार्दिक पंडयाच्या नेतृत्वाखाली चाचपडताना दिसत आहे.

Comments
Add Comment

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या

भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने

होबार्टमध्ये मारली बाजी, Team India ने साधली बरोबरी

होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने बरोबरी साधली आहे.