अपात्र शिधापत्रिका रद्द होणार; १ एप्रिलपासून सुरुवात

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ३१ मे पर्यंत शोधमोहीम चालणार


मुंबई (प्रतिनिधी): अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने राज्यभरातील अपात्र शिधापत्रिका (रेशनकार्ड) रद्द करण्यासाठी १ एप्रिलपासून शोधमोहीम हाती घेतली आहे. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशनकार्ड दिल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. विभागाने नुकताच याबाबतचा आदेश जारी केला. ही शोधमोहीम दोन महिने म्हणजे २१ मे २०२५ पर्यंत चालणार आहे. अपात्र रेशनकार्ड शोधण्याची मोहीम २८ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार हाती घेण्यात आली होती. पण त्यानंतर चारच महिन्यात त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आता पुन्हा नव्याने सुधारित मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच ती दरवर्षी राबवली जाणार आहे.


अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच काडांची तपासणी आता केली जाईल. जो कार्ड अपात्र असल्याचे आढळेल ती लगेच रद्द केली जाणार आहेत. सर्व रेशन दुकानदारांना त्यांच्याकडील काडांची तपासणी करण्यासाठी फॉर्म दिले जाणार आहेत. ते फॉर्म भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहेत ते स्पष्ट होईल. अर्ज भरताना वास्तव्याचा पुरावा सोबत द्यावा लागेल. हा पुरावा एक वपपिक्षा जुना नसावा, ही मुख्य अट आहे. कार्डधारकांकडून आलेल्या माहितीची तपासणी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाईल. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल त्यांना १५ दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत पुरावा सादर न केल्यास रेशनकार्ड रद्द करण्पात येणार आहे.


एका पत्त्यावर दोन रेशनकार्ड असतील किंवा एका कुटुंबात दोन रेशनकार्ड दिलेली असतील, तर त्यातील एक रद्द केले जाणार आहे. या शोधमोहिमेत शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी, कामगार ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि अशांकडे पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड असेल तर ती तत्काळ अपात्र ठरविली जातील. त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार रेशनकार्ड दिले जाईल. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती आणि मृत व्यक्तींना लाभार्थीच्या मादीतून वगळले जाणार आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या