CNG Price Hike : CNG गॅसच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू

नवी दिल्ली : सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जून २०२४ नंतर पहिल्यांदाच सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने आपल्या सीएनजी गॅसचे दर वाढवले आहेत. त्यानुसार हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा एकदा भार पडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.


इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच आयजीएलने सीएनजीची किंमत एक रुपयांवरून तीन रुपये केली आहे. दिल्लीत सीएनजीच्या किमतीत १ रुपयांची वाढ झाली आहे, तर इतर ठिकाणी ३ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आयजीएल दिल्लीमध्ये सुमारे ७० टक्के गॅस विकते, तर उर्वरित ३० टक्के गॅस इतर कंपन्यांचा आहे.सीएनजीच्या किमतीत झालेल्या या वाढीनंतर आता दिल्लीत सीएनजीची किंमत ७६.०९ रुपये झाली आहे आणि नोएडा-गाझियाबादमध्ये सीएनजी ८४.७० रुपये प्रति किलो झाली आहे.



मुंबईत आज सीएनजी ७७ रुपये प्रति किलोवर विकले जात आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये, आयजीएलने दिल्लीत सीएनजीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ब्रोकरेज फर्म जेफरीजने फेब्रुवारीमध्ये आयजीएलवरील त्यांच्या नोटमध्ये म्हटले होते की, सध्याची नफा कायम ठेवण्यासाठी २ रुपयांची किंमत वाढ पुरेशी असेल. भारतात सीएनजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी कार खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाल्याने वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन