Narayan Rane vs Uddhav Thackeray : 'चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम'

मुंबई : विकास, समृद्धी ही उद्धव ठाकरेंची कामंच नाहीत. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे. यामुळे त्यांचा पक्ष लहान होत चालला आहे. पुढच्या निवडणुकीनंतर हा पक्ष राहणार नाही, असे भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले. ते रामनवमीनिमित्त शिर्डीत सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरं देताना चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे, असे भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले.



प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही भाजपा खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिले. संजय राऊत या व्यक्तीने खासदार म्हणून देशासाठी, राज्यासाठी आणि स्वतःच्या गावासाठी काय योगदान दिले आहे ? असा प्रतिप्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. काही तरी बोलून चर्चेत राहणे आणि वाद निर्माण करत राहणे हेच काम संजय राऊत करत असल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले.
Comments
Add Comment

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ