अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूरसह देशभरात रामनवमीचा मोठा उत्साह

नवी दिल्ली: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूर, कोलकातासह देशातील विविध शहरांमध्ये सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामनवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.


संपूर्ण रामनगरी पाने-फुले तसेच रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आली आहे. श्रीराम जन्मभूमीचे मुख्य द्वार आणि राम मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोलकातामध्ये पाच मोठ्या यात्रांसह ५० हून अधिक रामनवमीनिमित्त यात्रा काढण्यात येतील अशी शक्यता आहे. यामुळे पोलिसांनी येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. युपीच्या ४२ शहरातही रामनवमी बाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.


या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. रामनवमीच्या निमित्ताने पश्चिम बंगाल हे संवेदनशील राज्य आहे. येथे गेल्या काही वर्षांमध्ये विविध शहरांमध्ये रामनवमीच्या निमित्त धार्मिक तणाव पाहायला मिळाला होता. यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस अलर्ट आहेत.


शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबईत १३,५००हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील नववा दिवस हा राम नवमी म्हणून साजरा केला जातो. हिंदू ग्रंथ आणि पुराणानुसार या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला रामनवमी म्हटले जाते.



पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामनवमीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा. प्रभू श्रीरामांचा हा जन्मोत्वस तुमच्या जीवनात नवी चेतना आणि नवा उत्साह घेऊन येवो. तसेच सशक्त, समृद्ध आणि समर्थ भारताच्या संकल्पनेला नवी ऊर्जा प्रदान करो. जय श्रीराम...असे पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.


 

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या