Viral Video : निरोप समारंभाचे भाषण करतेवेळी महाविद्यालयात विद्यार्थिनीचा मृत्यू

धाराशिव : परांडा तालुक्यातील शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभ सुरू होता. या समारंभात बोलतेवेळी २० वर्षांच्या वर्षा खरात हिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बोलता बोलता वर्षा स्टेजवर कोसळली. डॉक्टरांनी तपासून वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.





वर्षा निरोप समारंभात भाषण करत होती. ती भाषणाला उभी राहिली तेव्हा तिला कसला त्रास होत आहे, असे कोणालाही वाटले नव्हते. यामुळे बोलता बोलता ती कोसळली तेव्हा उपस्थित असलेले सर्वजण चक्रावले. डॉक्टरांनी वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर उपस्थितांना धक्का बसला.



निरोप समारंभाच्या भाषणात वर्षाने शिक्षकांचे आभार मानले. ती महाविद्यालयातील मैत्रिणी आणि शिक्षक यांच्यासंदर्भात बोलत होती. बोलत असताना ती कोसळली.

वर्षा स्टेजवर पडताच उपस्थितांपैकी काही जण स्टेजच्या दिशेने धावले. त्यांनी वर्षाला उठवण्याचा प्रयत्न केला. अनेकांना वाटले की चक्कर आल्यामुळे वर्षा स्टेजवर कोसळली आहे. प्रत्यक्षात भलतेच घडले होते. वर्षाची श्वसन प्रक्रिया थांबल्याची जाणीव होताच तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठव्या वर्षी वर्षाच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अखेरचा श्वास घेण्याआधीपर्यंत वर्षाने कधीही छातीत वेदना होत असल्याची तक्रार केली नव्हती. सध्या वर्षा कोणतेही औषध घेत नव्हती. यामुळे अचानक हृदयवाराचा तीव्र झटका कसा आला हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध