Viral Video : निरोप समारंभाचे भाषण करतेवेळी महाविद्यालयात विद्यार्थिनीचा मृत्यू

  68

धाराशिव : परांडा तालुक्यातील शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभ सुरू होता. या समारंभात बोलतेवेळी २० वर्षांच्या वर्षा खरात हिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बोलता बोलता वर्षा स्टेजवर कोसळली. डॉक्टरांनी तपासून वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.





वर्षा निरोप समारंभात भाषण करत होती. ती भाषणाला उभी राहिली तेव्हा तिला कसला त्रास होत आहे, असे कोणालाही वाटले नव्हते. यामुळे बोलता बोलता ती कोसळली तेव्हा उपस्थित असलेले सर्वजण चक्रावले. डॉक्टरांनी वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर उपस्थितांना धक्का बसला.



निरोप समारंभाच्या भाषणात वर्षाने शिक्षकांचे आभार मानले. ती महाविद्यालयातील मैत्रिणी आणि शिक्षक यांच्यासंदर्भात बोलत होती. बोलत असताना ती कोसळली.

वर्षा स्टेजवर पडताच उपस्थितांपैकी काही जण स्टेजच्या दिशेने धावले. त्यांनी वर्षाला उठवण्याचा प्रयत्न केला. अनेकांना वाटले की चक्कर आल्यामुळे वर्षा स्टेजवर कोसळली आहे. प्रत्यक्षात भलतेच घडले होते. वर्षाची श्वसन प्रक्रिया थांबल्याची जाणीव होताच तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि वर्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठव्या वर्षी वर्षाच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अखेरचा श्वास घेण्याआधीपर्यंत वर्षाने कधीही छातीत वेदना होत असल्याची तक्रार केली नव्हती. सध्या वर्षा कोणतेही औषध घेत नव्हती. यामुळे अचानक हृदयवाराचा तीव्र झटका कसा आला हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून