Mumbai Dabbawala : मुंबईचा डबेवाला चालला सुट्टीवर! नेमके कारण काय?

  98

मुंबई : मुंबईत लाखोंच्या (Mumbai News) संख्येने नोकरदार आहेत. मुंबईतील दोन लाख नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद राहणार आहे. कारण मुंबईतील डबेवाले (Mumbaicha Dabbawala) आता सहा दिवस सुट्टीवर चालले आहे. पांढरा पोशाख आणि पारंपरिक गांधी टोपी घालणारे मुंबईतील ५ हजार डबेवाला सहा दिवस गावी जाणार आहे. त्यामुळे ९ एप्रिलपासून ६ दिवस मुंबईतील डबेवाल्यांना घरचे जेवण मिळणार नाही. ९ ते १४ एप्रिलपर्यंतच्या ६ दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील.



मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यातील भागातील गावांमधून येतात. आता त्या गावांमध्ये ग्रामदैवत/ कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे ९ ते १४ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे. या सहा दिवसांत रविवारच्या एका सुट्टीचा समावेश आहे. तसेच महावीर जयंती, हनुमान जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती या सुट्ट्याही आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले दोन दिवस सुट्टी घेणार आहे. मंगळवार १५ एप्रिलपासून ही सेवा डबेवाले पुन्हा सुरू करणार आहे.



पूर्वजांची कोडिंग प्रणाली कायम?


उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेजला सुट्टी लागली आहे. तसेच सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांची जास्त अडचण होणार नाही. खासगी अास्थापनांमध्ये काम करणाऱ्यांची अडचण होईल. १८९० पासून मुंबईत डबेवाले सेवा देत आहेत. डब्बेवाल्यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेली कोडिंग प्रणाली २१ व्या शतकातही प्रचलित आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणतीही चूक न होता घरचा डबा मिळत असतो. सुरुवातीला ही साधी कोडिंग होती; परंतु आता मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हर्बल या ३ लोकल ट्रेन मार्गांसह व्यापक ट्रेन असल्याने कोडिंग अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टरमध्ये देखील विकसित झाले आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ

वसई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! ७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई

अखेर मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मिळाली, पण...

आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली मुंबई: मराठा आरक्षणाच्या

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या

मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील