मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ कॅरेट सोन्याच्या १६ सळ्या जप्त

मुंबई :  मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या विभाग क्रमांक तीन पथकाने १.०२ कोटी रु. किंमतीच्या २४ कॅरेट सोन्याच्या सळ्या (१६ तुकडे) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात कस्टम विभागाने एका संशयिताला अटक करून त्याच्या विरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सीमा शुल्क विभागाच्या कर्तव्यावर असलेल्या विभाग क्रमांक तीन पथकाला ४ एप्रिल २०२५ रोजी जेद्दाहहून इंडिगो एअरलाइन्सच्या विमान क्र. ६E९२ ने आलेल्या एका प्रवाशाच्या सामानाचा संशय आला. त्या सामानाची सखोल तपासणी करताना सामान तपासणी यंत्रामध्ये दोन इलेक्ट्रिक इस्त्री प्रेसमध्ये गडद प्रतिमा आढळल्या. इस्त्री प्रेस उघडून पाहिल्यावर त्यामधून २४ कॅरेट सोन्याच्या सळ्या (१६ तुकडे) सापडले.या सळ्यांचे एकूण वजन १२०० ग्रॅम आहे.


बाजारात या २४ कॅरेट सोन्याच्या १६ तुकड्यांची अंदाजित किंमत १.०२ कोटी रुपये आहे. या प्रकरणात संशयीत प्रवाशाला सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या