Mumbai Railway Megablock : जाणून घ्या रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लॉकची वेळ

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे देखभाल दुरुस्तीसाठी रविवार ६ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. मेगाब्लॉक काळात अनेक गाड्या रद्द केल्या जातील अथवा विलंबाने धावतील. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर सकाळी ११ नंतर मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी मध्यरात्री सव्वाबारा ते पहाटे सव्वाचार या वेळेत मेगाब्लॉक असेल. यामुळे दिवसा पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल.



मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ या वेळेत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक काळात माटुंगा ते मुलुंड दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या किमान २० मिनिटे विलंबाने धावतील.



मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी / नेरुळ दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक काळात ठाणे ते पनवेल/वाशी/नेरुळदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहणार आहे. हार्बर मार्गावर ब्लॉक नसल्यामुळे वाहतूक सुरू राहणार आहे.



पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिर दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर रविवारी ६ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ०४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉक काळात बोरिवली ते राम मंदिर दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या विलंबाने धावतील. दिवसा पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल.
Comments
Add Comment

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि