नरीमन पॉईंट ते विरार प्रवास होणार जलद

दक्षिण मुंबईतून केवळ एक तासात विरारला पोहोचता येणार


मुंबई : दक्षिण मुंबईत थेट पालघरला जोडता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा रस्ते मार्गे प्रवास अधिक सोईचा होणार आहे. उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाला मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्याची एकूण लांबी ५५.४२ किलोमीटर असेल. समुद्रातील रस्त्यावर एकूण ८ मार्गिका तर प्रत्येक दिशेला ४ मार्गिका असणार आहेत. उत्तन-विरार सागरी सेतू थेट मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेबरोबर विरारजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना विनाअडथळा थेट मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे.


राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्यावर परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याच्या मंजुरीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. तसेच केंद्राकडे सार्वभौम हमीचाही प्रस्ताव मांडला जाईल. तसेच, या प्रकल्पासाठी नाममात्र दरात जमीन देण्याची मागणी करण्याचा निर्णयही देण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह ते विरार अशा सागरी मार्गाची उभारणी केली जात आहे. मुंबई महापालिकेने उभारलेला मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला असून वांद्रे-वरळी सी लिंक वापरात आहे. सद्यस्थितीत एमएसआरडीसीकडून वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. त्यापुढे वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड उभारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.



तर एमएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या भाईंदर ते विरार सागरी मार्गामुळे दक्षिण मुंबईतून थेट विरार पर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होईल. त्यातून नरिमन पॉईंट येथून विरार येथे पोहोचण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ लागणार आहे. या प्रकल्पाची किंमत ८७,४२७ रुपये इतकी आहे. विरार कनेक्टर १८.९५ किमी इतका असून प्रकल्पाची एकूण लांबी ५५.४५ किमी आहे. सागरी सेतू २४ किमी असून वसई कनेक्टर २.५ किमी आहे. तर, उत्तन कनेक्टर १० किमी असणार आहे. समुद्रातील रस्त्यावर एकूण ८ मार्गिका असणार आहेत. प्रत्येक दिशेला ४ मार्गिका असणार आहेत. मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे.


येत्या वर्षात 'एमएमआरडीए' मार्फत ४ नव्या मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यामुळे ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. 'एमएमआरडीए'ने हाती घेतलेली मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून तिच्यावर १५ स्थानके असतील. यासाठी १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया 'एमएमआरडीए'ने सुरू केली आहे. मीरा रोड येथील शिवाजी चौक येथून विरारपर्यंत जाणाऱ्या मेट्रो १३ तसेच गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १० मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार आहे.

Comments
Add Comment

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग

SRH vs RR Eliminator : आज IPL मध्ये होणार सर्व्हायव्हल वॉर; राजस्थान विरुद्ध हैदराबादमध्ये निर्णायक लढत, हरला तो थेट स्पर्धेबाहेर!

IPL PLAYOFF : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज

Mumbai Railway Food Price Hike Cancelled : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वडापाव, समोसा आणि पफचे दर जैसे थे

मुंबई : मध्य रेल्वेने १ जूनपासून वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव अखेर मागे घेतला

Central Railway Stations Food Stalls : मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वडापाव, समोसा, भेळ महागणार; १ जूनपासून नवे दर लागू

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) उपनगरीय आणि प्रमुख स्थानकांवर मिळणारे लोकप्रिय स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ १ जून

MHADA Lottery 2026 : म्हाडा लॉटरी २०२६ ला प्रचंड प्रतिसाद! मुंबईतील २,६४० घरांसाठी ८२ हजारांहून अधिक अर्ज; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जाणून घ्या!

मुंबई : मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी म्हाडाची (MHADA Lottery 2026) घरांची सोडत मोठी

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली