नरीमन पॉईंट ते विरार प्रवास होणार जलद

दक्षिण मुंबईतून केवळ एक तासात विरारला पोहोचता येणार


मुंबई : दक्षिण मुंबईत थेट पालघरला जोडता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा रस्ते मार्गे प्रवास अधिक सोईचा होणार आहे. उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाला मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्याची एकूण लांबी ५५.४२ किलोमीटर असेल. समुद्रातील रस्त्यावर एकूण ८ मार्गिका तर प्रत्येक दिशेला ४ मार्गिका असणार आहेत. उत्तन-विरार सागरी सेतू थेट मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेबरोबर विरारजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना विनाअडथळा थेट मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे.


राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्यावर परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याच्या मंजुरीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. तसेच केंद्राकडे सार्वभौम हमीचाही प्रस्ताव मांडला जाईल. तसेच, या प्रकल्पासाठी नाममात्र दरात जमीन देण्याची मागणी करण्याचा निर्णयही देण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह ते विरार अशा सागरी मार्गाची उभारणी केली जात आहे. मुंबई महापालिकेने उभारलेला मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला असून वांद्रे-वरळी सी लिंक वापरात आहे. सद्यस्थितीत एमएसआरडीसीकडून वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. त्यापुढे वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड उभारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.



तर एमएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या भाईंदर ते विरार सागरी मार्गामुळे दक्षिण मुंबईतून थेट विरार पर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होईल. त्यातून नरिमन पॉईंट येथून विरार येथे पोहोचण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ लागणार आहे. या प्रकल्पाची किंमत ८७,४२७ रुपये इतकी आहे. विरार कनेक्टर १८.९५ किमी इतका असून प्रकल्पाची एकूण लांबी ५५.४५ किमी आहे. सागरी सेतू २४ किमी असून वसई कनेक्टर २.५ किमी आहे. तर, उत्तन कनेक्टर १० किमी असणार आहे. समुद्रातील रस्त्यावर एकूण ८ मार्गिका असणार आहेत. प्रत्येक दिशेला ४ मार्गिका असणार आहेत. मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे.


येत्या वर्षात 'एमएमआरडीए' मार्फत ४ नव्या मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यामुळे ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. 'एमएमआरडीए'ने हाती घेतलेली मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून तिच्यावर १५ स्थानके असतील. यासाठी १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया 'एमएमआरडीए'ने सुरू केली आहे. मीरा रोड येथील शिवाजी चौक येथून विरारपर्यंत जाणाऱ्या मेट्रो १३ तसेच गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १० मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार आहे.

Comments
Add Comment

Class 11 admission 2026 : ११ वी अ‍ॅडमिशन चुकलं? विद्यार्थिनींसाठी पुन्हा सुवर्णसंधी; विशेष फेरी-२ची घोषणा

- बुधवार १५ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालये सुरू होणार मुंबई : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश

Dr. Pankaj Bhoyar : मनोरंजन कायद्याखाली 'ऑर्केस्ट्रा'चे परवाने घेऊन डान्स बार चालवणाऱ्यांना दणका

विधानसभेत विधेयक एकमताने मंजूर; दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची तरतूद मुंबई : हॉटेल्स, उपाहारगृहे आणि मद्यपान

Amit Satam : विधान भवनाच्या पायऱ्यांवरील कॅमेऱ्यांना आवरा; अमित साटम यांची मागणी

- मृत्यूवर हसलो नाही, दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओची चौकशी करा मुंबई : विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधत

Ram Kadam : कबुतरांमुळे माझ्या आईचा जीव गेला!

- भाजप आमदार राम कदमांचा विधानसभेत दावा; तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश मुंबई :

Central Railway : दरडीनंतर मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! तब्बल ८० हजार प्रवाशांना ६ कोटींचा परतावा; गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ

कर्जत–लोणावळा दरम्यान ६ जुलै रोजी दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात

Mumbai-Nanded Weekly Trains : आनंदवार्ता! मुंबई आणि नांदेड दरम्यान नियमितपणे २ साप्ताहिक गाड्या सुरू

मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान नियमितपणे चालणाऱ्या २ साप्ताहिक