Akola Crime : संतापजनक! विषारी अन्न खायला देऊन २५हून अधिक कुत्र्यांचा बळी

मुंबई : अनेकांना प्राण्यांविषयी प्रेम नसते त्यामुळे अनेक जण त्यांचा तिरस्कार करतात. मात्र अकोल्यात एका माणसाने प्राण्यांबाबत क्रुरतेचा कळस गाठल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात म्हणून एका व्यक्तीने थेट कुत्र्यांचा जीव घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. (Akola News)



मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातल्या गुडधी भागात मुक्या प्राण्यांसोबत हा प्रकार घडला (Crime) आहे. एका व्यक्तीने मुक्या प्राण्यांना विषारी औषध अन्नात मिसळून ते खायला दिले. यामुळे जवळपास २५ पेक्षा अधिक कुत्र्यांना विषारी अन्न खाल्याने विषबाधा झाली आहे आणि अगदी २४ तासातच या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही जनावरे अजूनही गंभीर स्थितीत आहेत. या प्रकरणाची अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.


दरम्यान, या घटनेनंतर परिसरातून मुक्या श्वानाबाबत हळहळ व्यक्त होत असताना तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांनी संशयित व्यक्तीची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असून भाजपाचे पदाधिकारी आणि संदीप गावंडे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत अशाप्रकारे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.



सीसीटीव्हीत संपूर्ण थरार कैद


गुडधी परिसरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अनेक कुत्र्यांची मृत्युमुखी पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचा विषय बनत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक व्यक्ती क्षणांना काहीतरी खाण्यासाठी देत आहे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आलं. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Teacher Suicide Case : सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलांसोबत केलं भयकंर नंतर...

शिक्षक सुनील मोरेंनी रचला बनवा; आत्महत्या पूर्वी दोन्ही लेकरांची हत्या, पोस्टमार्टम रिपोर्ट आले समोर Teacher Suicide Case :

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी